शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

नेत्यांचे कोणत्या प्रकल्पात किती पैसे गुंतलेत याचे बिंग फोडणार, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 11:21 AM

शासनाच्या कंपन्या बंद पाडून या कंपन्या विकत घेण्याचे काम नेत्यांनी सुरू केले आहे; परंतु ते हाणून पाडावे लागेल.

कोल्हापूर : साखर कारखान्यांमधून शेतकऱ्यांना लुटून झाल्यानंतर आता या पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोरांनी वीज प्रकल्पाच्या माध्यमातूनही पैसे लुटायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोणत्या नेत्यांचे कोणत्या प्रकल्पात किती पैसे गुंतलेत याचे बिंग आठवडाभरात फोडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला आहे.

शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा या मागणीसाठी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सलग सातव्या दिवशी सोमवारी आंदोलन सुरू होते. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शेट्टी बोलत होते. शुक्रवारपर्यंत जर याबाबत निर्णय झाला नाही, तर शुक्रवारनंतरचे आंदोलन वेगळे आणि आक्रमक असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

ते म्हणाले, एक वीज प्रकल्प उभारण्यासाठी १५ ते २० कोटी रुपयांचा खर्च येतो. हीच वीज महावितरणाला विकून वर्षभरात हा पैसा वसूल होतो. त्यापुढे वीस वर्षे शेतकऱ्यांना लुटले जाते. शासनाच्या कंपन्या बंद पाडून या कंपन्या विकत घेण्याचे काम नेत्यांनी सुरू केले आहे; परंतु ते हाणून पाडावे लागेल.

विधानसभेचे अधिवेशन आता सुरू होणार आहे. हसन मुश्रीफ, सतेज पाटील हे दोन मंत्री मला भेटून गेले आहेत. त्यांनी दोन दिवस थांबायला सांगितले आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत वाट पाहणार आहे; परंतु जर तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मात्र यापुढचे आंदोलन उग्र असेल. आम्ही निवडून दिलेले आमदार जर या विषयावर अधिवेशनात तोंड उघडणार नसतील तर त्यांनासुद्धा गाव बंद केले जाईल, असाही इशारा शेट्टी यांनी दिला.

सोमवारी दिवसभरात अनेक कार्यकर्त्यांनी शेट्टी यांना पाठिंबा दिला. शियेच्या सरपंच रेखा जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ शेट्टी यांना भेटले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून पाठिंबा व्यक्त केला. यावेळी प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, तानाजी देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बारामतीत आंदोलन करायचे विसरलो नाही

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान देणे अजून शिल्लक आहे. जर या अधिवेशनात ही तरतूद झाली नाही तर बारामतीत आंदोलन करायचे आम्ही विसरलेलाे नाही, असेही शेट्टी म्हणाले.

चांदोलीतून पाणी सोडण्यासाठी मंत्रालयातून फोन

चांदोली धरणाखालील शासनाचा विद्युत प्रकल्प गेले आठ महिने बंद होता. मी १५ फेब्रुवारीला विचारल्यानंतर तो सुरू करण्यात आला. तेथून आता आठ मेगावॅट वीज तयार झाली आहे. मग तिथला शासनाचा प्रकल्प बंद आणि ‘महती’ कंपनीचा सुरू हे कोणाच्या फायद्यासाठी होते. या कंपनीचा मालक कोण आहे, हे अजित पवार यांना चांगले माहिती आहे. मीही माहिती घेतोय. ‘महती’ला वीज तयार करता यावी म्हणून जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयातून कोणी फोन केले हे मोबाइलचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर उघड होईल, असेही शेट्टी म्हणाले.

...तर सर्व खटले माेफत लढू

शेट्टी यांच्या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. एवढेच नव्हे, तर ही रास्त मागणी करताना जर खटले दाखल केले गेले तर सर्व खटल्यांचे कामकाज वकील मोफत करतील, अशी ग्वाहीही शिष्टमंडळाने दिली. अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, सचिव ॲड. विजयकुमार ताटे, देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बाकीचे आमदार कुठे गेले

हसन मुश्रीफ, सतेज पाटील हे दोन मंत्री आणि विनय कोरे, राजू आवळे हे दोन आमदार आंदोलनस्थळी भेटून गेले. बाकीचे आमदार आहेत कुठे अशी विचारणा शेट्टी यांनी केली. महाशिवरात्रीला आमदार गावातच थांबणार आहेत. तेव्हा त्यांना याबाबत जाब विचारा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीजRaju Shettyराजू शेट्टी