शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

देशासाठी कुणी मरायला सांगितलं होतं? शहीद ऋषिकेश जोंधळेंच्या कुटुंबीयांना ग्रामसेवकाचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 7:27 PM

जोंधळे-डवरी वाद चव्हाट्यावर.

आजरा : वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील सुपुत्र ऋषिकेश जोंधळे देशाच्या सीमेवर शहीद झाले. त्यांच्याच आई-वडिलांना गावातील ग्रामसेवकाने अपमानास्पद शब्द वापरल्याची संतापजनक घटना समोर आली. तुझ्या मुलाला देशासाठी कोणी मरायला सांगितले होते असे अपमानास्पद शब्द ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी याने वापरले.ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी याने जोंधळे कुटुंबीयांना मानसिक व मानहानीकारक त्रास देणे सुरू केले आहे. या ग्रामसेवकाच्या त्रासापासून आपल्याला संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्याकडे वीर पिता रामचंद्र जोंधळे व वीर माता कविता जोंधळे ( रा.बहिरेवाडी ता.आजरा) यांनी केली आहे.जोंधळे कुटुंबीयांनी दिलेल्या निवदेनात असे म्हटले आहे की, ऋषिकेश जोंधळे हे जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमेवर लढताना १३ नोव्हेंबर २०२० रोजी शहीद झाले. मुलगा देशासाठी शहीद झाल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून राज्यभरातून अनेक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी माझ्या घरी भेट देत आहेत. मात्र ग्रामसेवक डवरी याला या गोष्टी खटकत असल्याने तो वारंवार माझा व माझ्या परिवाराचा अपमान करीत आहे.१ जून रोजी ग्रामसेवक डवरी यांनी माझ्या बरोबर नाहक वाद घातला व तुझ्या मुलग्याला देशासाठी कोणी मरायला सांगितले होते असे अपशब्द वापरून आपल्या देशाचा व देशाच्या सीमेवर लढणाऱ्या असंख्य जवानांचा त्यांनी अपमान केला आहे. ज्या तिरंग्यातून माझ्या मुलाचा देह बहिरेवाडी गावी आणला तो तिरंगा ध्वज मी माझ्या अंगणात उभा केला होता. ग्रामसेवक डवरी यांनी कुत्सित बुद्धीने तो ध्वजही मला बळजबरीने काढायला लावला.माझ्या घराचे बांधकाम चालू असताना ग्रामसेवक डवरी हा माझ्याकडील बांधकाम कामगारांना नाहक त्रास देत होता. त्याच्या घराचे बांधकामाचे साहित्य जाणून बुजून आमच्या घरासमोर टाकले होते. हे साहित्य काढून घेण्याची विनंती केली असता उलट आम्हालाच शिवीगाळ करून आमचे विरोधात खोटी तक्रार दिली. त्यामुळे माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे. मुलगा शहीद झाल्यानंतर कुटुंबाचा आधार गेला. अशावेळी ग्रामसेवक डवरी माझ्या कुटुंबाचा जगण्याचा आधार काढून घेत आहे.भरचौकात फलक लावून बदनामीगेल्या आठवड्यात भरचौकात माझ्या कुटुंबीयांची फलक लावून बदनामी केली आहे व मानसिक खच्चीकरण केले आहे. त्यामुळे माझे कुटुंब पूर्णपणे असुरक्षित बनले आहे. एकीकडे ऋषिकेश जोंधळे शहीद झाल्यानंतर शासन, अधिकारी व समाजातून माझ्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला. मात्र आता ग्रामसेवक डवरी हा आमच्याच कुटुंबीयांच्या जीवावर उठला आहे. ग्रामसेवक डवरीपासून आमच्या जीविताला धोका आहे. तो प्रशासकीय सेवेत असल्यामुळे त्याच्या पदाचा वापर करून आमच्यावर दबाव आणत आहे त्याच्यापासून संरक्षण मिळावे, अशीही मागणी निवेदनातून रामचंद्र व कविता जोंधळे यांनी केली आहे.जोंधळे-डवरी वाद चव्हाट्यावरघरासमोर असणाऱ्या खडीच्या कारणावरून जोंधळे व दतात्रय शंकर डवरी यांच्या मध्ये १ जून रोजी वाद झाला होता . या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. डवरी यांनी आपल्याला मारहाण जोंधळे व त्यांच्या परिवाराने केली असल्याची वर्दी आजरा पोलिसांत केली होती. तेव्हा पासून डवरी व जोंधळे यांच्यात धुसफूस सुरु होती.डिटिजल बोर्ड हटवलाडवरी यांनी लावलेला फलक ग्रामपंचायतीने पोलिसांना बोलावून घेऊन हटवला असून तो फलक ताब्यात घेतला आहे . परस्पर विरोधी तक्रारी असल्याने डवरी व जोंधळे यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून पोलिस व ग्रामस्थ यांनी हा विषय सांमजस्याने सोडवला पाहिजे अशी ग्रामस्थांची धारणा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस