शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: जयश्री जाधव यांची हवा, सत्यजित कदम यांचाही दावा, निकालाची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 1:27 PM

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात ही काटाजोड लढत झाली

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत नक्की हवा कुणाची याची बुधवारी दिवसभर जोरदार चर्चा रंगली. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात ही काटाजोड लढत झाली आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले आहेत. परंतु काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या बाजी मारतील, असे सर्वसाधारण जनमानस तयार झाले आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. रिंगणात एकूण पंधरा उमेदवार असले तरी मुख्य लढत दुरंगीच झाली. ही जागा कोणत्याही स्थितीत जिंकायचीच या दृष्टीने दोन्ही पक्षांनी सर्व यंत्रणा कामाला लावल्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढतीतील चुरस कमी झाली नाही. मतदान किती होते याकडेही लोकांचे लक्ष होते.

पोटनिवडणुकीत सामान्यपणे कमी मतदान होते; परंतु या निवडणुकीत गेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाएवढेच मतदान झाले आहे. मतांची टक्केवारी वाढली असती तर लोक बदल करण्याच्या हेतून बाहेर पडले असा एक तर्क काढला जातो. परंतु येथे दोन्ही बाजूंने आपापले मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न झाले आहेत.

काँग्रेसची हवा कशामुळे..

  • मुख्यत: मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बुधवार, शुक्रवार पेठेचा परिसर आणि कसबा बाव़डा परिसरात काँग्रेसला चांगले मतदान झाल्याचा अंदाज त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. गेल्या निवडणुकीत शिवाजी पेठेने दिवंगत चंद्रकांत जाधव यांना चांगला हात दिला होता. या निवडणुकीत मंगळवार पेठेत जयश्री जाधव यांच्याबद्दल मोठी सहानुभूती राहिली. पेठेच्या उमेदवार म्हणून लोक स्वयंस्फूर्तीने मैदानात उतरल्याचे चित्र दिसले. त्याचा लाभ काँग्रेसला होण्याची शक्यता जास्त आहे. कसबा बावडा परिसरात सर्रास ७० ते ७२ टक्के मतदान झाले आहे. तेच निकालापर्यंत नेणारे असल्याचे काँग्रेसला वाटते.
  •  या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांवर दोन्ही पक्षांचे जास्त लक्ष होते. शिवसेनेचा पारंपरिक मतदार काँग्रेसच्या हातावर शिक्का मारणार नाही, अशी हवा तयार करण्यात आली होती. परंतु माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे आदींनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश मानून जिवापाड काम केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गडाला हादरे देण्यात फारसे यश आले नसल्याचे चित्र दिसते.
  • महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत अगोदरपासूनच एकजूट आहे. परंतु यावेळेला या दोन पक्षांसह शिवसेनेच्या नेते व कार्यकर्त्यांतही मनोमिलन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रचारात या तिन्ही पक्षांत कुठे समन्वयाचा अभाव, विसंवाद फारसा दिसून आला नाही. सगळ्यांनी मिळून प्रचार यंत्रणा राबवली, मतदान बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. 

भाजपचा दावा कशाच्या बळावर..

  • भाजपला मानणारा शहरात पारंपरिक मतदार आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाची मतदारांना अजूनही भुरळ आहे. पाच राज्यांतील यशानंतर भाजपची कोल्हापुरातही हवा तयार झाली होती. त्यामुळे कमळ या चिन्हाकडे पाहून चांगले मतदान झाल्याचे भाजपला वाटते.
  • या निवडणुकीत हिंदुत्वाचा खरा तारणहार भाजपच आहे, असे चित्र बिंबवण्याचा प्रयत्न या पक्षाकडून पद्धतशीरपणे झाला. अगदी मतदान केंदापर्यंत जय श्रीरामचा गजर सुरू होता. शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते काही झाले तरी हातावर शिक्का मारणार नाहीत, असा विश्वास भाजपला वाटत आहे. तो कितपत खरा ठरतो यावरच गुलाल ठरणार आहे.
  • शिवाजी पेठ, मंगळवार पेठ व कसबा बावडा या ठिकाणी भाजपचा बेस कमी असल्याने तिथे या पक्षाने सुरुवातीपासूनच सर्वात जास्त आर्थिक ताकद व यंत्रणा लावली होती. मुख्यत: शिवाजी पेठेत लिड नाही मिळाले तरी चालेल; परंतु तिथे फार मोठी पीछेहाट होऊ नये असेही प्रयत्न भाजपकडून झाले. शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील पेठेतील कार्यकर्त्यांने शेवटच्या काही दिवसांत कमळ हातात घेतल्याचे सांगण्यात येते.

सगळ्यात जास्त मतदान झालेली

कसबा बावडा येथील भारतवीर सामाजिक सभागृह : ८०.४८ (एकूण मते-३४०)

कसबा बावडा गावकामगार तलाठी कार्यालय : ८०.३४ (एकूण मते-८३४)

कसबा बावडा प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर : ८०.१४ (एकूण मते ११०८)

सगळ्यात कमी मतदान झालेले केंद्र

मध्यवर्ती विभागीय नियंत्रक कार्यालय (शिवाजी पार्क) - ४१.९९ (एकूण मते ९८६)

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा