शहरं
Join us  
Trending Stories
1
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 
2
पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला
3
धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी
4
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
5
जिओचा ग्राहकांना दुसरा धक्का! आधी किंमती वाढवल्या, आता Jio'ने 'हे' OTT वाले प्लॅनही केले बंद
6
‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका   
7
Ramayan: वनवासात चौदा वर्षं न झोपलेल्या लक्ष्मणाची झोप कोणाला मिळाली? वाचा!
8
"नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका 
9
IND vs ZIM 1ST T20I Live : भारताने टॉस जिंकला! ३ युवा खेळाडूंचे टीम इंडियात पदार्पण; गिल नव्या इनिंगसाठी सज्ज
10
Anant-Radhika Wedding : 'संगीत समारंभा'त विश्वविजेत्यांचे 'हार्दिक' स्वागत; नीता अंबानी यांना अश्रू अनावर, Video
11
टेस्लाला शाओमीचा धोबीपछाड! इलेक्ट्रीक कार SU7 भारतात या दिवशी लाँच होणार
12
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
13
कहरच झाला! साप दोनवेळा डसला म्हणून तरुण त्याला तीनवेळा चावला; साप मेला, तरुण वाचला
14
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
15
टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहाथ, वर्षभरात मोडला संसार, आता जगतेय सिंगल लाइफ
16
रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ
17
महिन्याला ३ हजाराची SIP करा अन् करोडपती व्हा! समजावून घ्या एसआयपीचं गणित
18
PHOTOS : "चमत्कार आणि...", अभिषेक शर्माची 'लकी चार्म', युवा खेळाडूची बहीण डॉक्टर कोमल शर्मा!
19
१ शेअरवर मिळणार ₹१०० चा डिविडेंड, 'या' कंपनीच्या शेअरहोल्डर्सना मिळणार १ वर ४ शेअर्स; जाणून घ्या
20
अभिनेत्री श्वेता शिंदेच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक, १८ तोळ्यांचे दागिने हस्तगत

पुणे-कोल्हापूर महामार्ग रुंदीकरणाने सारेच बेहाल, टोलच रद्द करण्याची मागणी 

By समीर देशपांडे | Published: June 10, 2024 5:49 PM

पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण हे प्रवाशांचा अंत पाहणारे ठरत आहे.

समीर देशपांडेकोल्हापूर : पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण हे प्रवाशांचा अंत पाहणारे ठरत आहे. सुमारे १०० हून अधिक असणारी दोन्ही बाजूंची डायव्हर्जन्स, त्यातील अशास्त्रीयपणा, कसेही काढण्यात आलेले सर्व्हिस रोड यामुळे वाहनधारक अक्षरश: हैराण झाले असून, जोपर्यंत काम पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोलच रद्द करण्याची मागणी होत आहे.गेली दोन वर्षे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याचे सहापदरीकरण सुरू आहे. त्यामध्ये नवे पूल, जुन्या पुलांची दुरुस्ती, नवे सेवा रस्ते मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे सहापदरीकरण करणे आवश्यक आहेच. परंतु ते करताना सध्याचा प्रवास हा किमान सुसह्य व्हावा, यासाठी प्राधिकरण आणि ठेकेदार काहीच काळजी घेणार नसतील तर मग त्यांना विचारणारे कोणी आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.येता-जाता असणारी १०० डायव्हर्जन्स आणि रस्ता रुंदीकरणामुळे यापूर्वीच्या चौपदरी रस्त्यावर वापरावयास शिल्लक असणारा भीतीदायक एकल मार्ग, रस्ता समपातळीत नसणे, त्यातच पडलेले खड्डे, अशास्त्रीय अडथळे यामुळे प्रवाशांना या मार्गावरचा प्रवास नकोसा झाला आहे. प्रवासी जीव मुठीत घेऊन दोन तास विलंबाने हा प्रवास करून आपल्याच नशिबाला दोष देत असल्याचे दिसून येत आहे.सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी, वेळेची बचत व्हावी, यासाठी नागरिक टोल भरत असताना या सेवाच सध्या सहापदरीकरणाच्या कामावेळी मिळत नसतील तर काम पूर्ण हाेईपर्यंत टोलच रद्द करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

वाहनधारकांनी सांगितलेले दोष

  • वाट्टेल तसे आडवे येणारे गर्डर
  • धोकादायक सेवा रस्ते
  • अचानक समोर येणारी डायव्हर्जन्स
  • ज्या ठिकाणी रस्ता पूर्ण त्या ठिकाणी अचानक उलट मार्गाने येणाऱ्या चारचाकी

कोल्हापूर-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अतिशय धोकादायक पद्धतीने सुरू आहे. महामार्ग प्राधिकरणाला कोणीच जाब विचारत नसल्याने त्यांच्या पद्धतीने काम सुरू आहे. धोकादायक आणि वेळखाऊ प्रवास असून, केवळ अपघातात कोणाचे जीव जात नाहीत म्हणून या मार्गावरील धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष सुरू आहे. -समीर परुळेकर, कोल्हापूर 

किमान दीड ते दोन तास विलंबाने धावणाऱ्या वाहनधारकांकडून वसूल करण्यात येणारा कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोलचा झिझिया कर म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ असेच काहीतरी आहे. वाहनधारक टोल देऊन प्रवासाला कमी कालावधी लागेल आणि कोणताही अपघात किंवा अडथळ्याशिवाय प्रवास होईल, या अपेक्षेने रस्ता वापरतात; पण या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल माफ करावा किंवा वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. तिऱ्हाईत यंत्रणेकडून निविदा वाचून या कामाची तपासणी होण्याची गरज आहे. -दौलत देसाई, माजी जिल्हाधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाका