शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

Kolhapur: काळम्मावाडी धरण फुटल्यावर शासन जागे होणार का ?, शिवसेनेची विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 12:05 PM

गळतीचे काम न सुरू झाल्यास गुरुवारी जलसमाधी

कोल्हापूर : दूधगंगा (काळम्मावाडी) धरण फुटल्यावर सरकार जागे होणार आहे का ? राज्य शासन माणसे मरण्याची वाट पाहत आहे का ? धरणाची गळती त्वरित बंद करा, अन्यथा गुरुवारी (दि. ३० मे) शिवसेनेच्या वतीने त्याच धरणात जलसमाधी आंदोलन केले जाईल, असा इशारा सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांना देण्यात आला.या धरणाची गळती दूर करण्यात जलसंपदा विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पोवार यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन देण्यात आले.सन १९९९ साली दूधगंगा धरणाचे काम पूर्ण झाले. १२२० मीटर लांबीचे दूधगंगा धरण गेली काही वर्षे मरण यातना भोगत आहे. यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार आहे. सर्वसाधारण ७० लिटर / सेकंद यावर कोणत्याही धरणाची गळती वाढून चालत नाही. दूधगंगा धरणातून पाण्याची गळती वाढतच गेली आहे. ती दि. २३/०१/२०२१ रोजी २११.१० लिटर / सेकंद इतकी गळती आहे.धरण सुरक्षित संघटना नाशिक यांनी दि. १९/०४/२०२१ व ०१/११/२०२१ रोजी पावसाळ्यापूर्वी पाहणी केली असता, दगडी धरणातून गळतीचे प्रमाण ३३.६८ लिटर/ सेकंद व २६४ लिटर / सेकंद इतकी आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. दूधगंगा प्रकल्प अंतर्गत गळती प्रतिबंध उपाययोजना सन २०२२-२३ दर सूचीवर आधारीत विशेष दुरुस्तीसाठी ८० कोटी ७२ लाख ११ हजार ८५४ इतक्या निधीचा प्रस्ताव शासनास पाठवला आहे. परंतु अध्यापही दूधगंगा धरणाच्या गळतीचे काम सुरू झालेले नाही.शिष्टमंडळात विजय देवणे, संजय पवार, सुनील शिंत्रे, सरेश चौगले, उत्तम पाटील, सुनील मोदी, सागर पाटील, उत्तम शेटके, बापू किल्लेदार, एम. एन. पाटील, विक्रम पाटील, जमीर ताशिलदार, अनिल चौगले, विजय टिपुगडे, विशाल देवकुळे, संभाजी भोकरे, दिनेश परमार, महादेव कुकडे, राजू यादव, संजय जाधव, दिनेश साळोखे यांचा समावेश होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणShiv Senaशिवसेना