कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे, बुके, केक या गोष्टी टाळून पाणीरूपी शुभेच्छा देण्याच्या केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी संकलित झालेले पाण्याचे ३५०० बॉक्स रविवारी (दि. १) महाराष्ट्र दिनी जत (जि. सांगली) या दुष्काळी भागासाठी रवाना करण्यात आले. दसरा चौक येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुद्ध पाण्याच्या बाटल्यांच्या बॉक्सने भरलेले ट्रक रवाना झाले.हे पाणी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी संदीप कुंभार, विवेक वोरा, अक्षय मोरे, पारस पालिचा, सुमीत पारखे, पुष्कर श्रीखंडे, विजय सुतार, सुजय मेंगाणे, धनंजय जरग यांनी जत येथील सर्व रुग्णालयांमधील रुग्णांना भाजपचे जतचे आमदार विलासराव जगताप व रवींद्र अरळी यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आले.यावेळी महेश जाधव, विजय जाधव, संतोष भिवटे, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, श्रीकांत घुंटे, दिलीप मैत्राणी, मामा कोळवणकर, मारुती भागोजी, नगरसेविका उमा इंगळे, रूपाराणी निकम, सविता भालकर, मनीषा कुंभार यांच्यासह संपतराव पवार, नचिकेत भुर्के, प्रभा इनामदार, तौफिक बागवान, हर्षद कुंभोजकर, संजय सावंत, आदी उपस्थित होते.
शुभेच्छारूपी ३५०० बॉक्स पाणी
By admin | Published: May 03, 2016 12:15 AM