शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

गाभाऱ्यात महिलांचा प्रवेश

By admin | Published: April 12, 2016 1:08 AM

अंबाबाई मंदिरप्रश्नी समझोता : प्रवेश एक दिवसापुरताच; वाद कायम

कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाला सोमवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला. प्रातिनिधिक स्वरूपात विविध संघटनांच्या सात महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश करून अंबाबाई देवीची ओटी भरली व स्त्री-पुरुष समानतेच्या परंपरेचे दर्शन घडविले. स्त्री-पुरुष समता समिती, अंबाबाई भक्त मंडळ, सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समिती आणि जिल्हा व पोलिस प्रशासनाच्या समन्वयाच्या भूमिकेमुळे शनिशिंगणापूरपाठोपाठ कोल्हापूरचे पुरोगामी पाऊल पडले; परंतु गाभाऱ्यातील प्रवेश हा आज एक दिवसापुरताच असून, कायमस्वरूपी महिलांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार का याबद्दल मात्र संभ्रमावस्था आहे. रोज सकाळी ७ ते ८ या वेळेतच फक्त महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.कोल्हापुरातील विठ्ठल मंदिर आणि जुना राजवाडा पोलिस ठाणे याठिकाणी स्त्री-पुरुष समता समिती, अंबाबाई भक्त मंडळ आणि टोलविरोधी कृती समिती यांच्यात सोमवारी सुमारे पाच तासांत झालेल्या तीन बैठकांनंतर अखेर प्रातिनिधिक स्वरूपात विविध संघटनांच्या दहा महिलांना अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास संबंधित महिला मंदिराच्या आवारात दाखल झाल्या. त्यांनी शनिमंदिराजवळील प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर संबंधित महिलांपैकी दोन महिला चुडीदार घालून होत्या म्हणून त्यांना वगळून अन्य सात महिलांना ५ वाजून २२ मिनिटांनी गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला. त्यांनी अंबाबाई देवीची ओटी भरून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांनी (पान ४ वर) सद्य:स्थिती काय होती...?अंबाबाई मंदिरात १५ एप्रिल २०११ ला तत्कालीन मनसेचे आमदार राम कदम यांनी गाभाऱ्यात जाण्याचे आंदोलन केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनीही महिलांसह विरोध मोडून गाभाऱ्यात प्रवेश केला होता; परंतु त्यावेळीही हा प्रवेश काही दिवसांपुरताच राहिला. पुन्हा देवीच्या गाभाऱ्याच्या चांदीच्या उंबऱ्यापर्यंतच सर्वसामान्य महिला व पुरुषांना सोडण्यात येत होते. गाभारा लहान आहे व देवीच्या अंगावर किमती दागिने असल्याचे कारण सांगून आत जाऊ दिले जात नव्हते. त्याला फक्त राजघराण्यातील महिलांचाच अपवाद होता.राजर्षी शाहूंच्या करवीरनगरीमध्ये स्त्री-पुरुष समानता आहे. काही कारणास्तव अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश दिला जात नव्हता; पण आता समन्वय व समझोत्याने महिलांना प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे इतरांनी आम्हाला शहाणपण शिकविण्याची गरज नाही. - सुवर्णा तळेकर, लाल निशाण पक्ष लेनिनवादीभद्रकाली ताराराणी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी कोल्हापुरात महिलांना करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश देऊन येथील महिला-पुरुषांनी नवा पायंडा पाडला आहे; शिवाय कोल्हापुरात स्त्री-पुरुष समानता असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे.- सीमा पाटील, ‘अंनिस’च्या कार्यकर्त्याचुडीदार म्हणून विरोध... एका बाजूला महिलांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो म्हणून आनंद व्यक्त होत असताना पुन्हा महिलांच्या कपड्यावरून त्यांना या प्रवेशापासून रोखण्यात आले. डॉ. मीनल जाधव, अरुणा माळी यांनी चुडीदार घातला होता. साडी नेसली नसल्यामुळे तुम्हाला गाभाऱ्यात जाता येणार नाही अशी मागासलेली भूमिका घेण्यात आली व त्यांना आत जाऊ देण्यात आले नाही.