शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

यंत्रमाग कामगार शेतीच्या कामावर

By admin | Published: August 14, 2015 12:00 AM

संपाचा फटका : गेल्या बावीस दिवसांपासून हजारो कामगार बेकार

गणपती कोळी -कुरुंदवाड  इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसाय गेल्या बावीस दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे हजारो कामगार बेकार झाले असून, हाताला काम मिळविण्यासाठी ग्रामीण भागाकडे वळत असून शेतामध्ये काम आहे का? अशी विचारणा करत शेतीच्या कामाला लागले आहेत. कामगार संपामुळे शहराची तसेच कामगारांची आर्थिक घडी विस्कटली असून, संप न ताणवता लवकर मिटविण्याची मागणी कामगार वर्गातूनच होत आहे.इचलकरंजी शहराला वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाते. यंत्रमाग व्यवसायाला सर्वच पूरक व्यवसाय निर्माण झाल्याने जवळपासच्या खेड्यातूनही मोठ्या प्रमाणात यंत्रमाग झाले आहेत. कामगारांची संख्या वाढल्याने त्यांचे संघटन करून नेतृत्व करणारे नेतेही पुढे आले. प्रारंभी संप हा कामगार आणि मालक यांच्यापुरता मर्यादित राहून दोघांच्यामध्ये चांगले संबंध ठेवून कामगार नेतेही समन्वय चर्चा घडवून संप मिटवत असत. मात्र, अलीकडच्या काळात संपाला राजकीय वलय लागल्याने कामगार-मालक यांच्या हितापेक्षा स्वप्रतिष्ठा वाढल्याने कामगार-मालक यांच्यामध्ये कटुता निर्माण होत आहे.सायझिंगच्या कामगारांना किमान वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या बावीस दिवसांपासून सायझिंग कामगार संपावर आहेत. त्यामुळे बीम तयार होत नसल्याने यंत्रमाग ठप्प झाला आहे. लूम्स, अ‍ॅटोलूम्स, सायझिंग, वार्पिंग, प्रोसेसिंग ही सर्व कारखानदारी एकमेकांवर अवलंबून असल्याने यातील एक घटक बंद पडला, की संपूर्ण यंत्रमागांचा खडखडाट थांबतो. या सर्व कारखान्यांतून सुमारे एक लाखापर्यंत कामगार वर्ग आहे. शिवाय कुरुंदवाड, टाकवडे, अब्दुललाट, शिरदवाड, आदी शहरांच्या परिसरातील यंत्रमाग थांबल्याने कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.मालकाविरुद्ध लढाई असल्याने रोजचा चरितार्थ चालविण्यासाठी अ‍ॅडव्हान्स रूपात रक्कम मागू शकत नाही. तसेच उलाढाल ठप्प झाल्याने यंत्रमाग व्यावसायिकही आर्थिक अडचणीत आहेत. या व्यवसायातील बहुतांश कामगारवर्ग कर्नाटकासह परराज्यातील आहेत. त्यामुळे अनेक कामगार गावाकडे परतत असले, तरी शिक्षणासाठी मुले असलेल्या कामगारांची गोची झाली आहे. एकूणच संपामुळे कामगारांची आर्थिक घडी विस्कटली असून, मालक आणि कामगारांच्या दोघांच्या हिताचा निर्णय घेऊन व्यवसाय चालू करून हाताला काम देण्याची मागणी कामगार वर्गातूनच होत आहे.तुटपुंजा पगाररोजचा चरितार्थ व शिक्षणाचा खर्च चालविण्यासाठी वस्त्रोद्योगातील कामगार आता ग्रामीण भागाकडे शेतीच्या कामाच्या शोधात लागले आहेत. शेतीच्या कामाची सवय नसतानाही घरचा चरितार्थ चालविण्यासाठी नाइलाजास्तव काम करणे भाग पडत आहे. मिळणारे तुटपुंजे पगार घेऊन घरी परतत असताना अनेक कामगारांचे डोळे पाणावत आहेत.