शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

जीबीसिंड्रोमपेक्षा भयानक; एसएसपीईच्या गंभीर आजाराची कोल्हापुरातही बालके

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:53 IST

राज्यातही अनेक रुग्ण, प्रभावी उपचारच नाहीत; हसती- खेळती मुले अंथरुणाला खिळून 

कोल्हापूर : जीबीसिंड्रोमपेक्षा भयानक असा एसएसपीईचा आजार महाराष्ट्रात पसरत असून लहान मुलांना ही लागण होत असल्याने हसती- खेळती मुले दोन महिन्यांतच अंथरुणाला खिळून पडत आहेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्रात ६४ जणांवर उपचार असून कोल्हापूर जिल्ह्यातही चार मुलांवर हे उपचार सुरू आहेत. नेमके कोणतेच प्रभावी उपचार नसल्याने महाराष्ट्र शासनाने याबाबतच्या औषधांची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.गोवरमुळे चार वर्षांनंतरच्या मुलांना हा आजार होत असून गोवर झालेल्या मुलांपैकी काही टक्के मुलांना हा आजार होतो. एसएसपीई या आजारामुळे मुलांच्या केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक हालचालींवर परिणाम होऊन मुले अंथरूणाला खिळून पडतात. विकसित देशांमध्ये या आजाराचे प्रमाण फारच कमी असल्याने यावर औषधांबाबतही प्रभावी संशाेधन झालेले नाही. त्यामुळे या आजारावरील औषधेही अनुपलब्ध आहेत. हा आजार झाल्यानंतर एक ते तीन वर्षांपर्यंतच मुलगा, मुलगी व्यक्ती जिवंत राहू शकतो, असा अनुभव येत आहे.हा आजार झालेल्या घरातील सर्वच सदस्यांचे जीवन मानसिक, आर्थिकद्ष्ट्याही अडचणीचे होते. रुग्णाची काळजी घेण्यासाठी एका व्यक्तीला घरीच थांबावे लागते. या आजारामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. त्यामुळे शासनाने याबाबतच्या औषधांची उपलब्धता करून द्यावी, अशी पालकांनी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार अशोकराव माने यांनीही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना याबाबत निवेदन दिले आहे.

रुग्णालयात दाखल करून उपचार होण्यातला हा आजार नाही. लवकर वाढणारा आणि कमी गतीने वाढणारा आजार असे याचे दोन प्रकार आहेत. अशा रुग्णांचे आयुष्यही कमी असते. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही. माझ्या गेल्या २४ वर्षांच्या रुग्णसेवेमध्ये अशा १४ जणांवर मी शक्य ते उपचार केले; परंतु यातील दहा जण दगावले आहेत. - डॉ. विलास जाधव, बाल मेंदूरोगतज्ज्ञ, कोल्हापूर 

ज्या आजारावर उपचारच नाहीत अशा आजाराने माझा मुलगा खितपत पडला आहे. धड त्याच्याकडे बघवतही नाही आणि त्याच्यासाठी काही करूही शकत नाही. जिवंतपणी या यातना आम्ही सहन करत आहोत. - पालक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल