शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

zero shadow: उद्या 'सावली'ही सोडणार कोल्हापूरकरांची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 14:07 IST

दिनांक ६ मे २०२२ रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंदापासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत जवळ जवळ ५० सेकंदांपर्यंत हा शून्य सावलीचा खेळ रंगणार आहे.

कोल्हापूर : खगोलशास्त्रात ज्या घटनेला शून्य सावली अथवा झिरो शॅडो असं म्हणतात, त्याची प्रचिती ६ मे २०२२ रोजी कोल्हापूरकरांना येणार आहे. या दिवशी ५० सेकंदांपर्यंत सावली कोल्हापूरकरांची साथ सोडणार आहेे. दिनांक ६ मे २०२२ रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंदापासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत जवळ जवळ ५० सेकंदांपर्यंत हा शून्य सावलीचा खेळ रंगणार आहे.

कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्यांना वर्षांतून दोन वेळेला हा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो; मात्र जे लोक कर्क, मकर आणि विषुववृत्ताच्या ठिकाणी राहतात, त्यांना वर्षातून एकदाच हा शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्ताच्या वरच्या भागात तसेच मकरवृत्ताच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना मात्र शून्य सावली दिवस अनुभवता येणार नाही. पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते, त्याला २३.५ डिग्री एवढा कल आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणाऱ्या मार्गाला आयनिक वृत्त म्हणतात. पृथ्वी ही कर्कवृत्तांवरून बरोबर तीन महिन्याने वसंत संपात बिंदूपाशी येते. या दिवशी १२ तासांची रात्र आणि १२ तासांचा दिवस असतो.

या दिवशी सूर्याची किरणे विषुववृत्तावर पडतात, त्यामुळे विषुववृत्तावरती कुठंही उभारले तरी आपली सावली काही काळ नाहीशी होते. यानंतर बरोबर तीन महिन्यांनी मकर वृत्तावरती,नंतर तीन महिन्यांनी परत विषुववृत्तावरती आणि परत तीन महिन्यांनी कर्कवृत्तावरती आपणांस शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो; मात्र कर्कवृत्त आणि विषुववृत्त या दोन स्थानांमध्ये सूर्याची किरणे ज्यावेळी १६.७४ डिग्री नॉर्थ या रेखांवृत्तावरती पडतील, त्यावेळी या ठिकाणी असणाऱ्या जागांवरती काही सेकंदाकरिता आपली सावली काही ठराविक वेळी काही सेकंदाकरिता अदृश्य होते.

या काळात जर सावधान स्थितीत उभे राहून किंवा आपल्या जागेवर उडी मारून पाहिले तर आपली सावली आपणास दिसणार नाही.या काळात जर सावधान स्थितीत उभे राहून किंवा आपल्या जागेवर उडी मारून पाहिले तर आपली सावली आपणास दिसणार नाही.

बरोबर तीन महिन्यांनी सूर्याच्या दक्षिणायन काळात ६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांपासून ५० सेकंदांपर्यंत पुन्हा एकदा शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. पृथ्वी जसजशी फिरत जाईल तसतसे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी शून्य सावलीचा आनंद घेता येईल. - प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर, भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र विभागप्रमुख, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरZero Shadow Dayशून्य सावली दिवस