शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
4
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
5
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
6
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
7
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
8
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
9
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
10
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
11
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
12
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
13
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
14
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
15
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
16
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
19
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
20
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

...म्हणून आज १०३ फूट उंचीचा तिरंगा फडकवला; केंद्रीय मंत्री अमित शाहांचं विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2023 4:30 PM

निजामासाेबतच्या लढाईत बसवकल्याण तालुक्यातील गाेरटा येथील १०० पेक्षा जास्त नागरिक शहीद झाले. त्याची आठवण म्हणून येथे शहीद स्मारक आहे

बालाजी थेटे

औराद शहाजानी (जि. लातूर) - देश स्वतंत्र झाल्यानंतरही हैद्राबाद, कर्नाटक, मराठवाडा हा भाग स्वतंत्र झाला नव्हता. तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मिल्ट्री कारवाई करुन हा भाग स्वतंत्र केला. तत्पूर्वी गोरटा गावात अडीच फुटांचा झेंडा फडकाविल्याने निजामाने १०३ लोकांची कत्लेआम केली होती. त्यामुळे आज येथे १०३ फुटांचा तिरंगा ध्वज फडविण्यात येत असून त्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोरटा (जि. बीदर) येथे रविवारी केले. स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसने निजामाच्या गुलामीची निशानी टिकविली. मात्र, भाजपाने ती मोडित काढून या भागाचे नामकरण केले अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.

कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील गाेरटा (ता. बसवकल्याण) येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा अनावरण व हुतात्मा स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत होते. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा, कर्नाटकचे मंत्री प्रभू चव्हाण, तेलंगणातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजयकुमार, आमदार शरणू सलगर, माजी आ. मारुतीराव मु़ळे, महाराष्ट्र भाजपाचे सचिव अरविंद पाटील निलंगेकर आदी उपस्थित हाेते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, निजामासाेबतच्या लढाईत बसवकल्याण तालुक्यातील गाेरटा येथील १०० पेक्षा जास्त नागरिक शहीद झाले. त्याची आठवण म्हणून येथे शहीद स्मारक आहे. स्मारकाचा विस्तार व सुशोभिकरण पुढील वर्षापर्यंत ५० कोटी खर्चून करण्यात येईल. काँग्रेसने निजामाचा इतिहास पुढे नेण्याचे काम केले. आम्ही ते पुसत या हैद्राबाद, कर्नाटक भागाचे नामकरण करुन कल्याण कर्नाटक केले. काँग्रेस व जनता दल ह्या एकाच नाण्याच्या दाेन बाजू आहेत. एकाच चक्कीचा आटा आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कर्नाटकच्या विकासासाठी भाजपाला बहुमताने विजयी करा, असे आवाहनही केले.

काँग्रेसने राममंदिरचा मुद्दा प्रलंबित ठेवला होता. तो न्यायालयाने निकाली काढला. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तेथील ३७० कलम भाजपाने रद्द करुन शांतता निर्माण केली. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले, निजामकाळात गोरटा गावातील नागरिकांनी वंदे मातरम् हे नाटक ठेवले हाेते. ते सादर करु नये, म्हणून निजामाने आदेश काढला हाेता. या आदेशाला न जुमानता येथील ग्रामस्थांनी नाटकाचे सादरीकरण केले. चिडलेल्या निजामाने जालियनवाला बाग हत्याकांडसारखी येथे नागरिकांची हत्या केली. यात १०३ हुतात्मा झाले. त्या़ंची आठवण म्हणून येथे हुतात्मा स्मारक बनविले आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Shahअमित शाह