शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

लातूर जिल्ह्यात घरपट्टी, पाणीपट्टीचे १३ काेटी ६६ लाख थकित!

By हरी मोकाशे | Updated: March 14, 2024 17:39 IST

जिल्हा परिषद : गावागावांत विशेष कर वसुली पंधरवाडा

लातूर : प्रत्येक गावांतील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींकडून घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जाते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन स्वाभिमान मोहीमही राबविण्यात आली. त्यामुळे वसुलीस गती मिळाली असली तरीही आणखीन १३ कोटी ६६ लाख ११ हजारांची थकबाकी शिल्लक आहे. ती वसूल करण्यासाठी आता विशेष कर वसूली पंधरवाडा राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक गावच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. मात्र, नियम, अटी आणि काही तांत्रिक बाबींमुळे गावातील सर्व भागांचा अपेक्षित विकास साधणे अडचणीचे ठरते. अशावेळी पाणीपट्टी, घरपट्टी कर वसुली अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यातून ग्रामपंचायतीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते.

जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतींची घरपट्टी, पाणीपट्टीची शंभर टक्के वसूली व्हावी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे अधिकाधिक कर वसूली झाली आहे.

एकूण कर : ६२,५६,२४,०००आतापर्यंतची वसुली : ४८,९०,१३,०००थकित रक्कम : १३,६६,११,०००

पावणेचार कोटींच्या घरपट्टीची थकबाकी...तालुका - थकित रक्कमअहमदपूर - ५७ लाख ४७ हजारऔसा - ५० लाख ७ हजारचाकूर - ३१ लाख २२ हजारदेवणी - २० लाख ५४ हजारजळकोट - १३ लाख ९३ हजारलातूर - ६९ लाख ८२ हजारनिलंगा - ५७ लाख ६१ हजाररेणापूर - २२ लाख ५२ हजारशिरुर अनं. - ११ लाख ६२ हजारउदगीर - ३७ लाख ५२ हजारएकूण - ३ कोटी ७२ लाख ३२ हजार

पाणीपट्टीपोटीच्या १० कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान...तालुका - थकित रक्कमअहमदपूर - ६७ लाख ४८ हजारऔसा - १ कोटी ३८ लाखचाकूर - ४८ लाख ९९ हजारदेवणी - २२ लाख २२ हजारजळकोट - १६ लाख ९३ हजारलातूर - ८२ लाख ३४ हजारनिलंगा - १ कोटी ११ लाखरेणापूर - ४० लाख ५३ हजारशिरुर अनं. - २० लाख ७८ हजारउदगीर - ६८ लाख ७४ हजारएकूण - ९ कोटी ९३ लाख

विभागीय आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी...जिल्ह्यात विशेष कर वसुली मोहीम राबवून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत कर वसुलीचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा कमी दिसून येत असल्याने विभागीय आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर वसुली ही ग्रामपंचायतीची नियमित बाब व मुलभूत कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

कर वसुलीसाठी विशेष मोहीम...ग्रामपंचायतींची १३ कोटी ६६ लाखांची कर वसुली थकित आहे. त्यासाठी १५ ते ३१ मार्च हा कालावधी विशेष कर वसुली पंधरवाडा म्हणून राबविण्याच्या सूचना बीडीओंना केल्या आहेत. शंभर टक्के कर वसुलीचे नियोजन करावे.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषदTaxकर