शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लातूर जिल्ह्यातील १५ हजार बालकांचे पहिलीच्या वर्गात पडणार पाऊल

By हरी मोकाशे | Updated: June 1, 2024 18:48 IST

सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचे गावस्तरावर सर्वेक्षण

लातूर : शहरातील बालकांचा अडीच वर्षे पूर्ण झाली की इंग्रजी शाळेत प्रवेश होऊन शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू होतो. ग्रामीण भागातही अंगणवाड्यांमुळे बडबड गीतांच्या माध्यमातून अध्ययन सुरू होते. मात्र, आपल्या लेकराचं पाऊल शाळेत कधी पडतं, याची उत्सुकता वाडी-ताड्यांवरील कुटुंबियांना असते. यंदा जिल्ह्यातील १५ हजार ४१५ बालकांचे पाऊल पहिलीच्या वर्गात पडणार आहे.

उन्हाळी परीक्षा संपल्यानंतर शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीबरोबर समग्र शिक्षा अभियानांतर्गत गावातील किती बालकांनी वयाची ६ वर्षे पूर्ण केली आहेत, याच्या सर्वेक्षणाला सुरूवात करतात. जिल्हा परिषदेंतर्गतच्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी जिल्ह्यात इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी प्रवेशपात्र असलेल्या मुलांचे गावस्तरावर सर्वेक्षण पूर्ण केले आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक, गणवेश देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले आहे.

१५४१५ विद्यार्थ्यांचा होणार पहिलीत प्रवेश...तालुका - प्रवेशपात्र विद्यार्थीलातूर - २३४७औसा - २४५४निलंगा - २२८३शिरुर अनं.- ६५३रेणापूर - १०२३उदगीर - १५०६जळकोट - ८१९देवणी - ९५३अहमदपूर - १७५९चाकूर - १६१८एकूण - १५४१५

साडेचार हजार जणांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण...जिल्ह्यात एकूण १५ हजार ४१५ विद्यार्थी पहिलीच्या वर्गासाठी प्रवेशपात्र असले तरी आतापर्यंत ४ हजार ६१४ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात औसा तालुक्यात १ हजार ५१६, निलंगा - १ हजार ८१, रेणापूर - ९१८ आणि उदगीर तालुक्यातील १ हजार ९९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अद्याप १० हजार ८०१ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया शिल्लक आहे.

गतवर्षी १९ हजार विद्यार्थ्यांचे झाले प्रवेश...गेल्यावर्षी जिल्ह्यात १९ हजार ३९ विद्यार्थ्यांचे पहिलीच्या वर्गात प्रवेश झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या कमी आहे. विशेषत: यंदा सर्वाधिक प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या औसा तालुक्यात आहे. सर्वांत कमी संख्या शिरूर अनंतपाळात आहे.

प्रवेशपात्र विद्यार्थी...मुले - ७७९१मुली - ७६२४एकूण - १५४१५

जिल्हा परिषदेच्या १२७५ शाळा...जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १२७५ शाळा आहेत. तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा ३५६ आहेत. दरम्यान, पटसंख्या वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून गावोगावी उपक्रम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद शाळांच्या पटवाढीसाठी उपक्रम...जिल्हा परिषद शाळांच्या पटवाढीसाठी प्रत्येक गावात प्रवेश पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत गावातून प्रभातफेरी काढून जागृती केली जाणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक दिंडी काढून जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. दरम्यान, काही शाळांनी अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यास सुरूवातही केली आहे.- प्रमोद पवार, उपशिक्षणाधिकारी

टॅग्स :SchoolशाळाlaturलातूरEducationशिक्षण