शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

लातूर जिल्ह्यातील १५ हजार बालकांचे पहिलीच्या वर्गात पडणार पाऊल

By हरी मोकाशे | Published: June 01, 2024 6:48 PM

सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचे गावस्तरावर सर्वेक्षण

लातूर : शहरातील बालकांचा अडीच वर्षे पूर्ण झाली की इंग्रजी शाळेत प्रवेश होऊन शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू होतो. ग्रामीण भागातही अंगणवाड्यांमुळे बडबड गीतांच्या माध्यमातून अध्ययन सुरू होते. मात्र, आपल्या लेकराचं पाऊल शाळेत कधी पडतं, याची उत्सुकता वाडी-ताड्यांवरील कुटुंबियांना असते. यंदा जिल्ह्यातील १५ हजार ४१५ बालकांचे पाऊल पहिलीच्या वर्गात पडणार आहे.

उन्हाळी परीक्षा संपल्यानंतर शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीबरोबर समग्र शिक्षा अभियानांतर्गत गावातील किती बालकांनी वयाची ६ वर्षे पूर्ण केली आहेत, याच्या सर्वेक्षणाला सुरूवात करतात. जिल्हा परिषदेंतर्गतच्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी जिल्ह्यात इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी प्रवेशपात्र असलेल्या मुलांचे गावस्तरावर सर्वेक्षण पूर्ण केले आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक, गणवेश देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले आहे.

१५४१५ विद्यार्थ्यांचा होणार पहिलीत प्रवेश...तालुका - प्रवेशपात्र विद्यार्थीलातूर - २३४७औसा - २४५४निलंगा - २२८३शिरुर अनं.- ६५३रेणापूर - १०२३उदगीर - १५०६जळकोट - ८१९देवणी - ९५३अहमदपूर - १७५९चाकूर - १६१८एकूण - १५४१५

साडेचार हजार जणांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण...जिल्ह्यात एकूण १५ हजार ४१५ विद्यार्थी पहिलीच्या वर्गासाठी प्रवेशपात्र असले तरी आतापर्यंत ४ हजार ६१४ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात औसा तालुक्यात १ हजार ५१६, निलंगा - १ हजार ८१, रेणापूर - ९१८ आणि उदगीर तालुक्यातील १ हजार ९९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अद्याप १० हजार ८०१ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया शिल्लक आहे.

गतवर्षी १९ हजार विद्यार्थ्यांचे झाले प्रवेश...गेल्यावर्षी जिल्ह्यात १९ हजार ३९ विद्यार्थ्यांचे पहिलीच्या वर्गात प्रवेश झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या कमी आहे. विशेषत: यंदा सर्वाधिक प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या औसा तालुक्यात आहे. सर्वांत कमी संख्या शिरूर अनंतपाळात आहे.

प्रवेशपात्र विद्यार्थी...मुले - ७७९१मुली - ७६२४एकूण - १५४१५

जिल्हा परिषदेच्या १२७५ शाळा...जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १२७५ शाळा आहेत. तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा ३५६ आहेत. दरम्यान, पटसंख्या वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून गावोगावी उपक्रम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद शाळांच्या पटवाढीसाठी उपक्रम...जिल्हा परिषद शाळांच्या पटवाढीसाठी प्रत्येक गावात प्रवेश पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत गावातून प्रभातफेरी काढून जागृती केली जाणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक दिंडी काढून जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. दरम्यान, काही शाळांनी अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यास सुरूवातही केली आहे.- प्रमोद पवार, उपशिक्षणाधिकारी

टॅग्स :SchoolशाळाlaturलातूरEducationशिक्षण