शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

२०२ शेतकऱ्यांना महाबीजच्या सोयाबीन बियाणाने दिला दगा

By आशपाक पठाण | Updated: July 19, 2023 20:55 IST

तक्रारदाराचे पंचनामे, शेतकऱ्यांचे लाखाे रूपये मातीत

आशपाक पठाण, लातूर: यंदा पाऊस उशिरा आला, आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस पडताच खरिपाची पेरणी केली. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असल्याने बाजारात विविध कंपन्यांची बियाणे विक्रीसाठी येतात. त्यात शेतकऱ्यांच्या मनात महाबीजची विश्वासार्हता अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात पेरा झाला. मात्र, विश्वासाच्या कंपनीने दगा दिल्याने लातूर जिल्ह्यात २०२ शेतकऱ्यांनी महाबीज विराेधात कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

उशिरा झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाणाची उगवण क्षमताही तपासून पाहिली नाही. विश्सासाने पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याने जिल्ह्यातील दोनशे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. औसा, निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. कुणाच्या एक, कुणाच्या दोन कुणाच्या तीन बॅगा उगवल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. यातून शेकडो हेक्टर्समध्ये शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचा खर्च मातीत गेला आहे.

एकरी १५ हजारांचा खर्च...

खरीपात सोयाबीन पेरणीसाठी एकरी किमान १२ ते १५ हजार रूपये खर्च येतो. शिवाय, उशिरा पेरणी झाल्यावर उत्पादनात घट होते. महाबीज कंपनीचे बियाणे अनेक भागात उगवले नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप झाला आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीमुळे आर्थिक फटका बसला आहे. कंपनीने तक्रारदार शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपये भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी केली आहे.

तक्रार देऊन आठ दिवस झाले....

औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार देऊन आठ दिवस लोटले तरी अद्यापही पंचनामे करण्यात आले नाहीत, असे तपसे चिंचोली, जवळगा पोमादेवी, दापेगाव, लामजना, गाडवेवाडी, भादा आदी गावातील शेतकरी रजनीकांत लोहारे,बबन स्वामी, शिवराज वडगावे, पंडित लोहारे, त्र्यंबक सुरवसे, शिवशंकर तुगावे, अंकुश पळसे, सिताराम यादव यांनी सांगितले.

कृषी विभागाकडून पंचनामे सुरू...

शेतकऱ्यांनी तक्रार दिल्यावर लागलीच पंचनामे केले जात आहे. यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती आहे. पंचनामा झाल्यावर शेतकऱ्यांना ग्राहक मंचात दावा दाखल करता येतो. तालुका कृषी विभागाकडून आलेले अहवाल एकत्रित करून आम्ही महाबीज कंपनीच्या अकोला येथील कार्यालयाकडे पाठविणार आहोत. बियाणे कोणत्या कारणाने उगवले नाही, हे पंचनाम्यानंतर स्पष्ट होते. जिल्ह्यातून २०२ शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत. यात औसा, निलंग्यातील शेतकरी जास्त आहेत. -रक्षा शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरी