शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लातूर जिल्ह्यात आरटीईच्या जागा २२ हजार; अर्ज आले केवळ एक हजार !

By संदीप शिंदे | Updated: April 30, 2024 18:20 IST

पालकांची अर्ज भरण्याकडे पाठ, अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ

लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून, जिल्ह्यात १ हजार ७३७ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २२ हजार ६१३ जागा भरल्या जाणार असून, ३० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. दरम्यान, जिल्ह्यात केवळ १ हजार ४३ अर्ज आले आहेत. नवीन नियमावलीमुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत असून, शिक्षण विभागाने १० मेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर ऑनलाइन प्रवेश देण्याची प्रक्रिया १६ एप्रिलपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यात १ हजार ७३७ शाळा आहेत. त्यामध्ये २२ हजार ६१३ जागा आरटीईनुसार आरक्षित आहेत. मात्र, ३० एप्रिल शेवटची तारीख असूनही केवळ १ हजार ४३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील बहुतांश शाळा या शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच आहेत. त्यामुळे किती पालक प्रवेशास पसंती देतात, याबाबतचे चित्र पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. ३० एप्रिल अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत होती. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याने शिक्षण विभागाने १० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. लातूर जिल्ह्यात ३० एप्रिल सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३ हजार ९८८ जणांनी अर्जांची माहिती भरली आहे. त्यातील २९४५ अर्ज कन्फर्म करण्यात आलेले नाही. तर केवळ १०४३ अर्ज कन्फर्म झाले असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले.

यंदा नवीन नियमावलीनुसार प्रवेश...आरटीई प्रवेश प्रक्रियेत यंदापासून बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरादरम्यान अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल तर एक किलोमीटरच्या अंतरावरील खासगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या शाळांची निवड करताना शासकीय शाळा, अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व शेवटी खासगी शाळा या प्राधान्यक्रमानुसार मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.

पालकांची अर्ज भरण्याकडे पाठ...मागील वर्षी आरटीई अंतर्गत जिल्ह्यात २०० खासगी शाळांनी नोंदणी केली होती. यामध्ये १६६९ जागांवर प्रवेश निश्चित झाले होते. यंदा तर नवीन नियमामुळे शाळांची संख्या २७३९ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे यात जिल्हा परिषद, शासकीय, महापालिका, नगरपालिका शाळांचा समावेश आहे. परिणामी, इंग्रजी शाळांच्या पर्यायास क्लिक होत नसल्याची पालकांची ओरड आहे. त्यामुळे अर्ज भरण्याकडे पाठ फिरविली आहे. ३० एप्रिल शेवटची तारीख असतानाही केवळ १ हजार अर्ज आल्याने पुढील दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :laturलातूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रRight To Educationशिक्षण हक्क कायदा