शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

बियाणे न उगवल्याच्या २२० तक्रारी, पंचनामे केवळ १४३ जणांचेच

By आशपाक पठाण | Published: July 24, 2023 6:28 PM

शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यावर कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे कर्मचारी सोबत घेऊन पंचनामे केले जात आहे.

लातूर : महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारींचा ओघ अजूनही कृषी विभागाकडे सुरूच आहे. सोमवारपर्यंत २२० शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या असून, यातील जवळपास १४३ जणांचे पंचनामे करण्यात आले आहेत. यासंदर्भात चार दिवसांत आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे उर्वरित पंचनामे गतीने करण्यात येत आहेत.

लातूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पाऊस उशिरा झाल्याने पेरण्याही उशिरा झाल्या. त्यातही विश्वासाच्या बियाणाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसला आहे. औसा, निलंगा तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाणाबाबत तक्रारी केल्या होत्या. तक्रार दिल्यावरही आठ आठ दिवस पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाची वाट न पाहता दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी जवळपास दहा हजार रुपयांचा जास्तीचा खर्च करावा लागला आहे. शिवाय, पेरणीला उशीर झाल्याने उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त होत आहे.

कृषी विभागाचे कर्मचारी बांधावर...बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी विभाग, महाबीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी पाहणी करून पंचनामे करीत आहेत. आतापर्यंत ७० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. चार दिवसांत उर्वरित पंचनामे पूर्ण करून याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाणार आहे.

विभागीय आयुक्तांना अहवाल देणार...शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यावर कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे कर्मचारी सोबत घेऊन पंचनामे केले जात आहे. सोमवारपर्यंत जवळपास २२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील ७० टक्के पंचमाने पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे सुरू आहे. यासंदर्भातचा अहवाल विभागीय आयुक्त, अकोला येथील महाबीज कंपनीला दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी दिली.

नुकसानभरपाई मिळणार कधी...महाबीजचे बियाणे न उगवण्याचे कारण पंचनाम्यातून स्पष्ट होईल. जिल्ह्यात औसा, निलंगा या दोनच तालुक्यातील सर्वाधिक तक्रारी आहेत. त्यामुळे या भागात आलेल्या बियाणांचा लॉट खराब आला का, पेरणीत काही गडबड झाली, ओलावा होता की नाही याची माहिती घेतली जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर अहवाल गेला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार असा प्रश्न आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर