शहरं
Join us  
Trending Stories
1
"कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही, धर्म..."; हिंसाचारानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं शांततेचं आवाहन 
2
बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; ISF च्या कार्यकर्त्यांकडून पोलीस लक्ष्य; वाहने फोडून पेटवली
3
कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाल्याचा दावा करणाऱ्या PSI वर गुन्हा दाखल; अटकेसाठी शोध सुरु
4
IPL 2025 : कोण आहे Shaik Rasheed? लेकाला क्रिकेटर करण्यासाठी बापही करायचा रोज ४० कि.मी. प्रवास
5
कर्नाटकात जातीय जनगणना अहवाल लीक होताच राजकारण तापलं, काँग्रेसमध्येच निर्माण झाला वाद
6
मुंबईतील पाणीटंचाईवर अखेर तोडगा; पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर टँकर चालकांचा संप मगे
7
“मोदीजी, RSSचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार?”: हर्षवर्धन सपकाळ
8
शिवसेना मी वाढवली, दानवे नंतर आले अन् काड्या...; चंद्रकांत खैरे संतापले, उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार
9
सौदीचा राजदूत बांगलादेशच्या मॉडेलच्या पडला प्रेमात; लग्नाची मागणी घातली अन् संबंध बिघडले, ती हसिना जेलमध्ये...  
10
दत्त जयंतीचा जन्म, समर्थ रामदास स्वामींचे दर्शन; गुरुनिष्ठेचा परम आदर्श श्रीधर स्वामी महाराज
11
रस्त्यावरच साप-कावळ्याचं 'द्वंद्वयुद्ध'! कोण हरलं, कोण जिंकलं? बघा थरारक VIDEO
12
८८ वर्षांच्या पत्नीचा 91 वर्षीय पतीवर अनैतिक संबंधांचा आरोप, रागाच्या भरात पतीनं केला चाकू हल्ला; न्यायालय म्हणालं...
13
पंचग्रही योगात मेष संक्रांती: ‘हे’ उपाय नक्की करा, महिनाभर फायदा मिळवा; ७ राशींवर सूर्यकृपा!
14
कोविड महामारीनंतर भारतात डिझेलच्या मागणीत मोठी घट; काय आहे कारण?
15
लंडनला ड्रामाचं शिक्षण घेतल्याचा हास्यजत्रेत उपयोग झाला का? ईशा डे म्हणाली...
16
"काँग्रेसनं मुस्लीम अध्यक्ष का बनवला नाही? बाबासाहेब जिवंत होते तोवर..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
भांड्यांवरचे काळे डाग फ्रीजमधील छोट्याशा गोष्टीने पटकन होतात गायब, रेस्टॉरंट्समध्ये वापरतात अशी भन्नाट युक्ती
18
एकनाथ शिंदेंनंतर आता अजितदादांचा नंबर... मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा रोहित पवारांचा दावा
19
सोने खरेदी करण्याचा प्लॅन करताय? एका तोळ्यामागे १.३० लाख रुपये तयार ठेवा; 'या' बँकेचा अंदाज
20
जुलै महिन्यात मोठा जलप्रलय येणार; जपानी भविष्यवेत्त्याने जगाला हादरवून सोडले, एवढे देश...

३८ टक्के खातेदार शेतकऱ्यांच्या पदरामध्ये २२६ कोटींचे पीकविमा अग्रीम

By हरी मोकाशे | Updated: July 4, 2024 19:44 IST

गतवर्षीचा खरीप : केवळ सव्वातीन लाख अर्जदारांची बोळवण

लातूर : गेल्या वर्षीच्या खरीपात पावसाचा विलंब आणि २१ दिवसांपेक्षा अधिकच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना २५ टक्के पीकविमा अग्रीमची आशा होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ ३८ टक्के अर्थात ३ लाख २५ हजार ७८६ खातेदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला. परिणामी, उर्वरित शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मंडळातील पीकविमाधारकांना २५ टक्के आग्रीम देण्याचे आदेश दिले होते. तेव्हा पीकविमा कंपनीने विभागीय आयुक्त, राज्य आणि केंद्र शासनाकडे धाव घेत आक्षेप सादर केले होते.

पीक संरक्षणासाठी साडेआठ लाख अर्ज...प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत गेल्या वर्षी ८ लाख ६१ हजार ६७५ अर्ज दाखल झाले होते. ५ लाख ९९ हजार १४२ हेक्टरवरील पीक संरक्षित करण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील ३ लाख २५ हजार ७८६ खातेदार शेतकऱ्यांना २२६ कोटी ४१ लाख ३२ हजार ३५ रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.

२१ दिवसांच्या खंडाचा ३ लाख अर्जदारांना लाभ...गेल्या वर्षीच्या जुलै आणि ऑगस्टच्या कालावधीत पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिक ताण दिला होता. त्यामुळे सोयाबीन उत्पन्नात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. परंतु, केवळ ३२ मंडळातील ३ लाख ८ हजार ९२४ अर्जदारांना २५ टक्क्यांप्रमाणे २१० कोटी ५८ लाख १३ हजार ८९४ रुपयांची भरपाई मिळाली आहे. अद्यापही उर्वरित ७५ टक्के भरपाई मिळाली नाही.

तीन प्रकारांत मिळाली भरपाई...नैसर्गिक आपत्ती - ११ कोटी ३३ लाखकाढणी पश्चात - ३ कोटी ९५ लाखपावसाचा ताण - २१० कोटी ५८ लाखएकूण - २२६ कोटी ४१ लाख

लातूर तालुक्यास सर्वाधिक पीकविमा...तालुका - विमा वितरणअहमदपूर - २ कोटी ७७ लाखऔसा - ५३ कोटी ७० लाखचाकूर - ३५ कोटी ९२ लाखदेवणी - ६६ लाख ७० हजारजळकोट - ८ कोटी ४१ लाखलातूर - ५९ कोटी ८२ लाखनिलंगा - ४२ कोटी ३४ लाखरेणापूर - ६ कोटी ४८ लाखशिरुर अनं. - ६ कोटी ६५ लाखउदगीर - ९ कोटी ९३ लाखएकूण - २२६ कोटी ४१ लाख

सातत्याने पाठपुरावा...गेल्या वर्षीच्या खरीपात ८ लाख ६१ हजार ६७५ खातेदार शेतकऱ्यांनी ५ लाख ९९ हजार १४२ हेक्टरवरील पीक संरक्षित केले होते. त्यापैकी ३ लाख २५ हजार ७८६ अर्जदारांना भरपाई देण्यात आली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने पीकविमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाlaturलातूरFarmerशेतकरी