शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

लातूरात बियाणे, खतांचे ३० नमुने अप्रमाणित; कृषी सेवा केंद्र चालकांना ताकीद !

By हरी मोकाशे | Updated: August 7, 2024 18:23 IST

कृषी सेवा केंद्रांची पाहणी : संंशयित ८४३ नमुन्यांची तपासणी

लातूर : खरीप हंगामात कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने चार महिन्यांत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. तेव्हा संशयास्पद असलेले बियाणे, खत, किटकनाशकांचे ८४३ नमुने घेतले. त्याची प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आली असता ३० नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कृषी केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे.

खरीप हंगाम हुकुमी मानला जातो. वेळेवर दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ९ हजार ८३१ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे. १०१.७३ टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीनचा सर्वाधिक ४ लाख ९९ हजार २०० हेक्टरवर पेरा झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना दर्जेदार बी- बियाणे, खते आणि किटकनाशके मिळावीत. तसेच फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात आली.

जिल्ह्यात ११७५ कृषी सेवा केंद्र...जिल्ह्यात बियाणे विक्रीचे १ हजार १७५ कृषी सेवा केंद्र आहेत. तसेच खत विक्रीचे १ हजार ९२ तर किटकनाशक विक्रीचे ९६० परवाने आहेत. दरम्यान, एप्रिल ते जुलैअखेरपर्यंत जिल्हा, तालुकास्तरीय पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे.

प्रयोगशाळेत ११ घटकांची तपासणी...जिल्हा कृषी विभागाकडून घेण्यात आलेल्या संशयास्पद बियाणे नमुन्यांची तपासणी परभणी, खतांची छत्रपती संभाजीनगर आणि किटकनाशकांची अमरावती येथील प्रयोगशाळेत करण्यात येते. तिथे जवळपास ११ घटकांची तपासणी करण्यात येते. त्यानंतर ३० दिवसांपर्यंत अप्रमाणित नमुन्यांचा अहवाल कृषी विभागाकडे पाठविण्यात येतो. त्यानंतर कार्यवाही करण्यात येते.

एकूण ८४६ नमुन्यांचे उद्दिष्ट...प्रकार - उद्दिष्ट - साध्य - अप्रमाणितबियाणे - ४६८ - ५१४ - १०रासायनिक खते - २५१ - २३४ - १५किटकनाशके - १२७ - ९५ - ०५एकूण - ८४६ - ८४३ - ३०

निकृष्ट बियाणांचा सर्वाधिक धोका...शेतकरी महागामोलाची बी- बियाणे खरेदी करुन पेरणी करतात. निष्कृष्ट बियाणे लागल्यास शेती उत्पन्नावर पाणी फिरते. शिवाय, लागवडीचा खर्चही निष्फळ ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून बियाणांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संतोष लाळगे यांनी सांगितले.

नियमानुसार तात्काळ कार्यवाही...बी- बियाणे, खते, किटकनाशकांच्या गुणवत्तेसंदर्भात शंका आल्यास तात्काळ नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येतात. जिल्ह्यात बियाणांचे १०, रासायनिक खतांचे १५ आणि किटकनाशकांचे ५ नमुने अप्रमाणित आल्याने नियमानुसार काही कृषी सेवा केंद्र चालकांना सुधारण्यासाठी ताकीद देण्यात आली. तसेच काहींवर न्यायालयीन खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.- मिलिंद बिडबाग, प्रभारी कृषी विकास अधिकारी.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र