शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

लातूरसाठी ६२.१५ टक्के मतदान; तीन गावांचा बहिष्कार राहिला कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 17:46 IST

तीन गावांमध्ये बहुसंख्य जणांचा बहिष्कार अखेरपर्यंत राहिला.

लातूर : जिल्ह्यात रस्ता, पीकविमा व मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी सुनेगाव-शेंद्री, तळेगाव (बोरी) आणि गोटेवाडी या तीन गावांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला, तर आनंदवाडी, पिरू पटेलवाडी, रामघाट तांडा येथील मतदान केंद्रांकडे दुपारपर्यंत कोणीही फिरकले नव्हते. जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ६२.१५ टक्के मतदान झाले. 

अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव-शेंद्री या गावाला रस्ता नसल्याने पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. पाच किलोमीटरच्या मार्गासाठी १४ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. दरम्यान, रस्त्याच्या मागणीसाठी ५५५ मतदार असलेल्या सुनेगाव केंद्रावर एकानेही मतदान केले नाही. तर औसा तालुक्यातील गोटेवाडी येथील ग्रामस्थांनीही पाणी व रस्त्याच्या मागणीसाठी बहिष्कार टाकला. एकूण २२२ मतदारांपैकी १७ जणांनी मतदान केले. तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तळेगाव बोरी येथे एकूण मतदारांची संख्या १५०५ असून, त्यातील केवळ ५ जणांनी मतदान केले. सदर गावाला पीकविमा, रस्ता व दुष्काळाच्या उपाययोजना नाहीत.

तीन गावांमध्ये बहुसंख्य जणांचा बहिष्कार अखेरपर्यंत राहिला. चाकूर तालुक्यातील आनंदवाडी, पिरु पटेलवाडी, रामघाट तांडा येथे आश्वासन मिळाल्याने दुपारनंतर बहिष्कार मागे घेण्यात आला. दरम्यान, आनंदवाडी येथे मतदान संपण्याला काही अवधी असताना केंद्रात सहा पूर्वी दाखल झालेल्या मतदारांचे रात्री ११पर्यंत मतदान चालले. एकुण ७५३ मतदारांनी हक्क बजावला. 

मतदान शांततेतलातूर लोकसभा मतदारसंघात ६२.१५ टक्के मतदान झाले असून, अंतिम आकडेवारी रात्री उशिरा हाती येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. कुठेही मतदान यंत्र बिघाडाचे वृत्त नसून, सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlatur-pcलातूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019