शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर !

By संदीप शिंदे | Published: October 10, 2023 5:42 PM

आर्थिक घडी विस्कटणार :खाद्यतेल आयात केल्यामुळे दरात घसरण...

उदगीर : येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात एक महिन्यापासून घसरण सुरुच असून, मंगळवारी मार्केट यार्डात शासनाने चालू हंगामासाठी जाहीर केलेला ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभावही सोयाबीनला मिळाला नाही. केवळ ४ हजार ५५० रुपयांचा दर मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, चिंतेत भर पडली आहे.

यावर्षी सोयाबीनची पेरणी केल्यानंतर कमी पावसाच्या तडाख्यातून शेतकऱ्यांनी थोड्या प्रमाणात का होईना पीक वाचविले. सध्या तालुक्यात कडक ऊन पडल्यामुळे सोयाबीनचे पीक वाळून चालले आहे. त्यामुळे सोयाबीनच्या कापणी कामाला वेग आला आहे. मागील वर्षीपेक्षा कापणीच्या मजुरी दरात वाढ झाली आहे. प्रति बॅग चार हजार रुपये मजुरी मोजावी लागत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यातच बाजारात सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

कमी पावसामुळे सोयाबीनची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी पीक वाया गेले आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या मोठ्या खंडामुळे एकरी उत्पादन कमालीचे घटले आहे. ज्या शेतामध्ये मागील वर्षी आठ ते दहा पोते सोयाबीन उत्पादन होते, त्याच शेतात यंदा तीन पोते उतारा येत आहे. शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिवळा तांबोरा रोगाने पिकाचे नुकसान केले. अशा एक ना अनेक संकटातून वाचलेल्या सोयाबीन पिकाची काढणी, मजुरीचा वाढलेला दर, मळणी यंत्राचा खर्चाची गोळा बेरीज केल्यास शेतकऱ्यांच्या हाती नुकसानच शिल्लक आहे. मागील वर्षापासून सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घट होत आहे. बाजारात नवीन सोयाबीन येण्याच्या अगोदर जुन्या सोयाबीनचा दर ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिरावला होता. परंतु मागील आठवड्यापासून उदगीरच्या बाजारात नवीन सोयाबीनची आवक बऱ्यापैकी होत आहे. बाजारात नवीन सोयाबीनची आवक जरी चांगली होत असली तरी दर मात्र घसरत आहेत.

मंगळवारी बाजारात ४५५० रुपयांचा दर...चालू हंगामासाठी शासनाने सोयाबीनचा दर ४६०० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे. परंतु मंगळवारी मार्केट यार्डमध्ये ४ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. त्यात पुन्हा ओलावा पाहून दर ठरत असल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनातून काहीही शिल्लक राहणार नसल्याचे संकेत दिसत आहेत. सोयाबीन कारखानदाराकडून मागणी जेमतेम असल्यामुळे बाजारात दर घसरण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र शासनाने सुरु करण्याची मागणी होत आहे.

खाद्यतेल आयात केल्यामुळे दरात घसरण...केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात बाहेर देशातून खाद्यतेल आयात करण्यासाठी आयात शुल्कमुक्त धोरण अवलंबले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आवक झालेली आहे. सोबत सोयाबीन पेंडीला ग्राहक नाही. तसेच विदर्भातील सर्वच बाजारपेठेत, मध्य प्रदेशात नवीन सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्याचा परिणाम आपल्या बाजारपेठेवर दिसून येत असल्याने दर घसरले आहेत, असे सोयाबीन खरेदीदार व्यापारी अमोल राठी यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीlaturलातूर