शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
3
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
4
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
5
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
6
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
7
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
8
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
9
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
10
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
11
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
12
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
13
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
14
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
15
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
16
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
17
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
18
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
19
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
20
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर लातूर जिल्ह्यात वरुणराजाची हजेरी

By हरी मोकाशे | Published: September 04, 2023 7:35 PM

जलसाठा वाढण्यासाठी दमदार पावसाची गरज

लातूर : तब्बल महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटेच्या सुमारास वरुणराजाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. पावसाने पिकांना तूर्तास जीवदान मिळाले आहे. मात्र, प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी सर्वदूर व दमदार पावसाची गरज आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १६.०१ मिमी पाऊस झाला आहे.

यंदा जिल्ह्यात पाऊस उशिरा सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्याही विलंबाने झाल्या. जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्रावर पेरा झाला. दरम्यान, पिकांपुरता रिमझिम पाऊस झाल्याने सोयाबीनसह इतर पिके चांगली बहरली होती. मात्र, जुलैअखेरपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे फुलोऱ्याच्या अवस्थेतील सोयाबीनची फुलगळती झाली. शिवाय, वाढही खुंटली. दरम्यान, पावसाने ताण कायम ठेवल्याने हलक्या व मध्यम जमिनीवरील करपून गेली, तर चांगल्या जमिनीवरील पिकांना शेतकऱ्यांनी पाणी दिल्याने तग धरून राहिली. मात्र, सोयाबीनच्या अपेक्षित उत्पादनात जवळपास ६० ते ८० टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

तब्बल महिनाभरानंतर जिल्ह्यातील सर्व भागात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आशा उंचावल्या आहेत. खरिपातील सोयाबीनला फटका बसला असला तरी किमान पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, अशी आशा आहे. त्यामुळे दमदार पावसाकडे लक्ष लागून आहे.

आतापर्यंत सरासरी ३५९.३ मिमी पाऊस...

तालुका - २४ तासांतील पाऊस - आतापर्यंतचा पाऊसलातूर - २०.४ - ३३५.३

औसा - १७.४ - २५१.२अहमदपूर - १३.५ - ३५१.०

निलंगा - १६.२ - ३४१.७उदगीर - ८.९ - ४८३.४

चाकूर - २२.० - ३१२.६रेणापूर - ११.७ - २८०.९

देवणी - १२.४ - ५२८.६शिरुर अनं.- २४.३ - ३८४.०

जळकोट - ९.९ - ४२४.४एकूण - १६.१ - ३५९.३

जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण...

दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत थंड गारवा जाणवत होता. जिल्ह्यातील येरोळ, देवणी, निटूर, खरोसासह काही भागात मध्यम व रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. मात्र, विहिरी, तलावातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची अद्यापही गरज आहे. त्यामुळे पावसाकडे नजरा लागून आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत २२१ मिमीची तूट...गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५८०.५ मिमी पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत सरासरी ३५९.३ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास २२१.२ मिमी पावसाची तूट आहे. जुलैअखेरपासून पावसाने ताण दिल्याने उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. आता वातावरणात बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरRainपाऊस