शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India meets PM Modi: 'जगज्जेती' टीम इंडिया PM मोदींना भेटली, दीड तास रंगल्या गप्पा गोष्टी (Video)
2
हुतात्मा अग्निवीरांना आर्थिक मदत नाही, राहुल गांधींचा दावा लष्कराने फेटाळला, शहीद अग्निवीराचे वडील म्हणाले...  
3
वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार? संजय राऊतांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...
4
Team India ने मोदींची भेट घेतली; पंतप्रधानांच्या एका कृतीने मात्र लक्ष वेधले, वाचा सविस्तर
5
सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले, अटक करा; एसटी कामगार संघटनेचे आंदोलन
6
Sanjay Raut : "अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना..."
7
ऐश्वर्या राय-श्रीदेवीनं नाकारलेल्या या सिनेमानं रवीना टंडनला बनवलं स्टार, अक्षय कुमार होता मुख्य भूमिकेत
8
₹१४५ वरून ₹५००० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर; १००००० कोटींपार गेलं मार्केट कॅप
9
खासदार बांसुरी स्वराज यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, NDMC सदस्य म्हणून नियुक्ती! 
10
सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'मुंज्या' मधील हा अभिनेता साकारणार खलनायक, सेटवरील फोटो व्हायरल
11
Weight loss Tips: आरोग्य शास्त्रानुसार वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यायला हवे? वाचा
12
Credit Score : वेळेवर EMI भरुनही क्रेडिट स्कोअर कमी झाला? वाचा नेमकं कारण काय?
13
MCA ची चाहत्यांना खुशखबर! वानखेडेमध्ये मोफत एन्ट्री; 'चॅम्पियन' संघाला पाहण्याची सुवर्णसंधी
14
विश्वविजेते टीम इंडियाचे ४ मुंबईकर खेळाडू थेट अधिवेशनात; विधिमंडळात होणार सत्कार
15
मुंबई देशातील सर्वात महागडे शहर, तर इस्लामाबाद जगात सर्वात स्वस्त; यादीत अव्वल कोण?
16
'रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी', दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मविआचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
17
वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार
18
सायंटिस्ट हादरले! पहिल्यांदाच एका रोबोटची आत्महत्या; कामाच्या प्रेशरला कंटाळला, जिन्यावरून उडी घेतली
19
"मी कोणताही पक्ष बदललेला नाही, जनता हाच...", अजित पवारांकडून जनतेला भावनिक साद!
20
T20 WC FINAL : 'सूर्या'च्या मॅचविनिंग कॅचचा Best Angle; टीकाकारांची बोलती बंद करणारा Video

राशी झाल्यानंतर शेतमाल थेट बाजारात; लातूरात सोयाबीनची विक्रमी आवक

By हरी मोकाशे | Published: November 04, 2023 7:03 PM

दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला विक्रमी ११ हजार रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळाला होता.

लातूर : जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनच्या पिकाच्या राशी होताच शेतकरी थेट शेतमालाला बाजारपेठ दाखवित आहेत. त्यामुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. शनिवारी ५२ हजार ३४७ क्विंटल अशी आवक झाली. दरम्यान, आवक वाढूनही दर मात्र स्थिर राहिल्याचे पहावयास मिळाले.

जिल्ह्यात सोयाबीनवर प्रक्रिया करणारे मोठमोठे उद्योग असल्याने येथे सोयाबीन मोठी आवक होते. खरीपात ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. मात्र, फुल- फळ धारणेच्या कालावधीत पावसाने ताण दिला आहे. तसेच येल्लो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांची घट झाली. तीन आठवड्यांपासून शेतकरी सोयाबीनच्या राशी करीत आहेत. आर्थिक अडचणींतील शेतकरी हाती चार पैसे असावेत म्हणून सोयाबीन थेट बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत.

एका दिवसात आवक दुप्पटमागील १५ दिवसांपासून बाजार समितीत सोयाबीनची आवक सुरू होती. मात्र, ती २० हजार क्विंटलच्या जवळपास होती. शुक्रवारी आवक वाढून २९ हजार ४३६ क्विंटल झाली, तर शनिवारी जवळपास दुप्पट आवक झाली. दिवसभरात ५२ हजार ३४७ क्विंटल झाली. त्यामुळे आडत बाजारात जिकडे- तिकडे सोयाबीनचे कट्टे दिसून येत आहेत.

सर्वसाधारण दर ४ हजार ७७० रुपयेशनिवारी सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर घसरतील की काय अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. मात्र, दर स्थिर राहिल्याने बळीराजास काहीसा दिलासा मिळाला. कमाल भाव ४ हजार ८५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला. किमान ४ हजार ७०० रुपये तर सर्वसाधारण दर ४ हजार ७७० रुपये मिळाला. शुक्रवारी कमाल भाव ४ हजार ८४५, किमान ४६०० तर सर्वसाधारण ४ हजार ७६० रुपये राहिला होता.

किमान दरात शंभर रुपयांची वाढआवक वाढली की दर घसरतात, असा शेतकऱ्यांना नेहमीचा अनुभव आहे. शनिवारी आवक दुप्पट होऊनही किमान दरात शंभर रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले. सोयाबीन घेऊन आलेल्या वाहनांच्या मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वाराजवळ रांगाच रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मापतोल करणे सुरू होते.

गेल्या वर्षीचेही सोयाबीन बाजारातदोन वर्षांपूर्वी सोयाबीनला विक्रमी ११ हजार रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळाला होता. मात्र, गत हंगामात कमी दर असल्याने आगामी चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री केली नाही. परंतु, सतत भाव घसरत असल्याने आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी आता सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत.

व्यापाऱ्यांना सूचनाकुठल्याही शेतकऱ्याची अडचण होऊ नये याची व्यापाऱ्यांनी दक्षता घ्यावी. वेळेवर मापतोल करावेत. दीपावलीचा सण काही दिवसांवर आल्याने शेतमालाची पट्टी विनाविलंब द्यावी, अशा सूचना व्यापाऱ्यांना केल्या आहेत.- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डlaturलातूरFarmerशेतकरी