शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लातूर मनपाला जाग; अनधिकृत होर्डिंगवर जेसीबी

By हणमंत गायकवाड | Updated: May 17, 2024 13:02 IST

लातूर शहरांमध्ये ३६१ अनाधिकृत होर्डिंग आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही की स्टॅबिलिटी प्रमाणपत्र नाही. अनेकांनी बिनधास्तपणे होर्डिंग लावलेले आहेत.

लातूर: शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले असून मुंबई येथील दुर्घटनेनंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महानगरपालिका आणि नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश दिल्यानंतर मनपाला जाग आली आहे. शहरात जेसीबीद्वारे होर्डिंग काढण्याच्या कारवाईला बुधवारी दुपारनंतर प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत आठ ते दहा अनधिकृत होर्डिंग करण्यात आले होते. दरम्यान, होर्डिंगमधून तीन एजन्सींकडून एप्रिल २०१९ ते मार्च २०२३ पर्यंत १९ लाख ५७ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

लातूर शहरांमध्ये ३६१ अनाधिकृत होर्डिंग आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही की स्टॅबिलिटी प्रमाणपत्र नाही. अनेकांनी बिनधास्तपणे होर्डिंग लावलेले आहेत. विशेष दोघा-तिघांचा अपवादवगळता अनेकांनी अधिकृत शुल्कही भरलेले नाही. याकडे मनपाचे दुर्लक्ष कसे राहिले, हा प्रश्न आहे. अनधिकृत होल्डिंग लावण्यास कोणाचे अभय आहे. या बाबीची चौकशी होण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले असून अनधिकृत होर्डिंग राजरोसपणे कसे लावण्यात आले याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अनाधिकृत होर्डिंग लावण्याला कोणाचे अभय? चौकशीची मागणीवादळी वारे आणि अवकाळी पाऊस शहरावर घोंगावत आहे. अशावेळी मान्सूनपूर्व कामे करणे अपेक्षित असते. मात्र, मान्सूनपूर्व कामे राहिले बाजूला. अनधिकृत कामाचा ताण मनपात आहे. चिरीमिरीमुळे अनधिकृत कामे वाढतात,असा आरोप राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. कोणाच्या सांगण्यावरून अनधिकृत होर्डिंग लावले? त्यावर मनपाने कारवाई का केली नाही? कारवाई करण्याकडे डोळेझाक का केली? त्याला कोण जबाबदार ? याची चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनात राष्ट्रवादीने केली आहे.

मान्सूनपूर्व कामाकडे महानगरपालिकेचे नेहमीच दुर्लक्ष..दरवर्षी शहरातील प्रभाग क्र ३,४,५ आणि लातूर शहरातील पूर्वभाग व सखल भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या घरात आणि झोपडट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते, रस्त्यांवर पाणी साचते, नाले तुंबतात. पावसाळ्यातील वादळी वाऱ्यांमुळे धोकादायक झाडे, फलक उन्मळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी तुंबणाऱ्या भागाची पाहणी करून पाण्याचा निचरा करणे. रस्त्यावर पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे, चेंबर्स साफ करणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतंत्र विभाग उभारण्याबाबत काही निर्णय घेणे. पावसाचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर काही उपाययोजना आखणे, मान्सूनपूर्व उपाययोजनांशी संबंधित सर्व कामे प्राधान्याने करणे या कामाकडे महानगरपालिका प्रशासनाचे सध्या तरी दुर्लक्ष दिसत आहे.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण