शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
3
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
4
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
5
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
6
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
7
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
8
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
9
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
10
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
11
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
12
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
13
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
14
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
15
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
16
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
17
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
18
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
19
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
20
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी

कृषी विभागाचे वरातीमागून घोडे; मुदतअखेरीस पीकविमा जागृती !

By हरी मोकाशे | Published: December 08, 2023 6:33 PM

ज्वारीसाठीची मुदत संपली : हरभरा, गव्हाच्या विम्यासाठी आठवडा शिल्लक

लातूर : शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असलेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार प्रभारींवर असल्याने त्याचा परिणाम बळीराजावर पडत आहे. रबी हंगामातील ज्वारीचा विमा उतरविण्याची मुदत संपली आहे तर हरभरा, गव्हाचा विमा काढण्यासाठी आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. पीकविमा जनजागृतीची कृषी विभागाला आता जाग आल्याने शुक्रवारपासून १० वाहनांद्वारे प्रचारास सुरुवात केली आहे. कृषीचा हा कारभार म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची चर्चा होत आहे.

कुठलीही नैसर्गिक आपत्ती येऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यास सदरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे खरीप आणि रबी या दोन्ही हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची नेहमीच लक्ष असते. दरम्यान, यंदा राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांचा आणखीन ओढा वाढला आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसाठी १ नोव्हेंबरपासून पीकविमा भरण्यास सुरुवात करण्यात आली. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात ऑनलाईन प्रस्ताव दाखल करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ज्वारीसाठी ५ डिसेंबरपर्यंत तर हरभरा, गव्हासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तेव्हा कृषी विभागाकडून १० वाहनांद्वारे जिल्ह्यात पीकविम्यासंदर्भात जनजागृती करण्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सव्वातीन लाख हेक्टरवर पेरा...जिल्ह्यात रबीचे सरासरी क्षेत्र ३ लाख १७ हजार २३ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ३ लाख २२ हजार २५४ हेक्टरवर पेरा झाला आहे. त्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला असून तो २ लाख ६४ हजार ४४३ हेक्टरवर झाला आहे. त्यापाठोपाठ ज्वारीचा ३१ हजार ३४४ हेक्टरवर पेरा झाला आहे. तसेच गव्हाचा केवळ ८ हजार ५९३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा...पीक - पेरणीज्वारी - ३१३४४गहू - ८५९३मका - १५५३हरभरा - २६४४४३करडई - १५६४२जवस - ७९सूर्यफुल - ३९

सात महिन्यांपासून प्रभारीराज...जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांची मे अखेरीस बदली झाली. तेव्हापासून या पदाचा कारभार प्रभारींवर सुरु आहे. त्यामुळे प्रभारींसह काही कर्मचाऱ्यांवरही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे. सध्याचे प्रभारी हे प्रशिक्षणासाठी अन्यत्र गेल्याने कृषी उपसंचालकांवर पदभार सोपविण्यात आला आहे. सात महिन्यांपासून नियमित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे.

१५ डिसेंबरपर्यंत पीकविम्याची मुदत...ज्वारीसाठीचा विमा काढण्याची मुदत संपली आहे. हरभरा आणि गहू पिकांचा विमा काढण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एक रुपयांत पीकविमा काढण्याचे बहुतांश शेतकऱ्यांना माहिती आहे. प्रचार, प्रसिध्दीसाठी पीकविमा कंपनीकडून काल १० वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.- महेश क्षीरसागर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाlaturलातूरFarmerशेतकरी