शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

पंचांगकर्त्यांचा मोठा अंदाज; यंदा पाऊसमान सरासरी गाठेल, मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 13:48 IST

मनुष्याच्या निसर्गचक्राशी विसंगत वागणूकीने ग्रहस्थितीनुसार पर्जन्ययोग असूनही प्रत्यक्षात पाण्याची नक्षत्रे कोरडी जात असल्याचे मत पंचांगकर्त्यांनी नोंदवले आहे

- व्ही. एस. कुलकर्णीउदगीर: यंदा पाऊस नेहमीपेक्षा उशिरा सुरू होईल, काही भागांत पावसाचा जोर राहील तर काही भागांत कमी राहील. पाऊसमान सरासरी गाठेल, मात्र पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागेल. पडलेल्या पावसाचे पुनर्भरण करावे लागेल.यासाठी सरकारी नियोजन कमी पडणार असल्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तवला आहे.

यंदा रोहिणी, मृग नक्षत्रात वारे व वादळ होवून पावसाचे आगमन होईल. नियमित पाऊस २० जून नंतर सुरू होईल.आर्द्रा नक्षत्रात थोडा फार पाऊस होईल. मघा, पूर्वा, उत्तरा, ही नक्षत्रे चांगली वृष्टीकारक असून, हस्त नक्षत्राचे पूर्वार्धात चांगली वृष्टी होईल. पावसाचे मान हे नेहमीच लहरी व खंडवृष्टीकारक झाले आहे. त्यामुळे जेवढा पाऊस पडतो , त्या पाण्याची साठवणूक , पाणी जिरवण्याची योग्य व्यवस्था  याद्वारे पाण्याचे नियोजन जनतेने अवश्य करावे ही काळाची गरज आहे. बेसुमार वृक्षतोड, वाढलेले तापमान, निसर्गचक्राशी विसंगत वागणूक यामुळे ग्रहस्थितीनुसार पर्जन्ययोग असूनही प्रत्यक्षात पाण्याची नक्षत्रे कोरडी जात असल्याचा अनुभव  पहायला मिळत आहे. तर कांही वेळा अनपेक्षितपणे अतिवृष्टी होवून  शेतीचे नुकसान होत असल्याचा अंदाज एका पंचांगकर्त्यांनी वर्तवला आहे.

३ वर्षांत ५०० मिमी पेक्षा कमी पाऊस१९८६, १९९२, १९९४ सालीही उदगीर तालुक्यात ५०० मि. मी. पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कालावधीत पर्यावरणाचा विनाश कमी असल्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळत होते. अन्नधान्याचा तुटवडा व रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. आजघडीला ही परिस्थिती बदलली आहे. अन्नधान्याचा मुबलक साठा असला तरी एक दोन वर्षे झाली की, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावीच लागते. त्यामुळे पडलेल्या पावसाचे नियोजन करून पुनर्भरण करणे काळाची गरज असल्यामुळे हे बंधनकारक करण्याची वेळ आता आली आहे. हे अंदाजही वेगवेगळ्या पंचांगकर्त्यांनी वर्तवले आहेत.

पुनर्भरण बंधनकारक असावेउदगीर तालुक्यात गेल्या ३५ वर्षात केवळ पाच सहा वेळा जलयुक्त व जलपुनर्भरणाची कामे झाली .तेंव्हाच पाणी पातळीत वाढ होऊन तालुका टँकरमुक्त झालेला होता. पाण्याची ओरडही कमी झाली होती. पर्यावरणाच्या विनाशामुळे उदगीरचे सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या ५८ वर्षाच्या पर्जन्यमानाचा आढावा घेतला असता उदगीर तालुक्यात तब्बल ४३ वर्षे सरासरी इतका पाऊस झालेला नाही. उदगीर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८५० ते ९०० मि. मी. एवढे आहे.१९६५ पासून केवळ १३ वर्षच एक हजार मि. मी. च्या वर पाऊस होऊन  तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली होती. १९७१ साली ३८९ मि. मी. व १९७२ साली केवळ १७९ मि. मी. एवढाच पाऊस झाला होता. हे दोन्ही वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून प्रसिद्ध होते. 

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर