शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

कांद्याबरोबरच आता छाननी समितीनेही आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी!

By हरी मोकाशे | Published: July 07, 2023 6:33 PM

कांदा विक्री अनुदान : १ हजार १७६ पैकी १२५ प्रस्ताव मंजूर

लातूर : बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अनुदान जाहीर केले हाेते. दरम्यान, जिल्ह्यातून एकूण १ हजार १७६ प्रस्ताव सादर झाले होते. छाननी समितीत १ हजार ५१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव विविध कारणांनी अपात्र ठरविले आहेत. त्यामुळे अनुदानाच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू पुसण्यासाठीच्या समितीने पाणी आणल्याचे पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील काही शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. सर्वाधिक लागवड ही टोमॅटोची असते. सिंचनाची सोय असलेले जिल्ह्यातील काही शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कांद्याचेही उत्पादन घेत आहेत. दरम्यान, गत जानेवारी अखेरपासून ते मार्चच्या कालावधीत राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. परिणामी, कांदा उत्पादकांच्या पदरी लागवडीचा खर्चही पडला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले.

काही शेतकऱ्यांनी लागवडीचा नव्हे तर वाहतुकीचाही खर्च निघत असल्याने संताप व्यक्त करीत आंदोलने केली. त्यामुळे राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दोन बाजार समितींमध्येच सौदा...जिल्ह्यात एकूण ११ बाजार समित्या आहेत. त्यापैकी लातूर आणि औसा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे सौदे होतात. लातूर बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या १ हजार १५६ तर औश्यात २० शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते. एकूण १ हजार १७६ प्रस्ताव दाखल झाले होते. त्याची तालुकास्तरीय समितीकडून छाननी करण्यात आली.

७/१२ वर नोंद नसल्याने अपात्र...कांदा लागवडीची ७/१२ वर नोंद नसणे, उन्हाळी हंगाम, कांदा विक्री व हिशोबपट्टी यांच्यात तफावत आढळून आल्याने तालुकास्तरीय समितीने ११७६ पैकी १ हजार ५१ प्रस्ताव अपात्र ठरविले आहेत. जिल्ह्यातून केवळ १२५ मंजूर आहेत. कांदा उत्पादकांना जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत अनुदान मिळणार आहे.

३६ लाखांचे मिळणार अनुदान...लातूर बाजार समिती अंतर्गतच्या १२० शेतकऱ्यांसाठी ३५ लाख ९ हजार १८० रुपये, तर औसा बाजार समिती अंतर्गत ५ शेतकऱ्यांसाठी ८९ हजार ३९३ रुपये मिळणे अपेक्षित आहे. एकूण ३५ लाख ९८ हजार ५७४ रुपयांचा निधी आवश्यक आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

अनुदानासाठी प्रस्ताव सादर...जिल्ह्यातील १२५ कांदा उत्पादकांसाठी ३५ कोटी ९८ लाख ५७४ रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. अनुदान मागणीचा प्रस्ताव पणन संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच अनुदान उपलब्ध होईल.- एस. आर. नाईकवाडी, जिल्हा उपनिबंधक.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर