शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
4
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
5
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
6
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
7
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
8
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
9
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
10
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
11
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
12
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
13
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
14
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
15
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
16
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
19
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
20
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

१० दिवसांपासून निर्जळी; पालथ्या घागरी ठेवून औसा पालिका प्रशासनावर संताप

By हरी मोकाशे | Published: February 27, 2023 6:15 PM

पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी काँग्रेसचे आंदोलन 

औसा (लातूर) : थकित वीजबिलापोटी विद्युत कनेक्शन तोडण्यात आल्याने १० दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडली आहे. परिणामी, शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सोमवारी काँग्रेसने पालिकेत पालथ्या घागरी ठेऊन प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

५० हजार लोकसंख्येच्या औसा शहरात सध्या कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा योजना चांगल्या असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वीजबिल थकित राहिले आहे. परिणामी, दीड महिन्यात महावितरणने तिसऱ्यांदा पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे विद्युत कनेक्शन तोडले आहे. शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीनेग्रेसच्या वतीने पालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले. तसेच पालथ्या घागरी ठेवून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शकिल शेख, खुंदमिर मुल्ला, अंंगद कांबळे, अनिस जहागीरदार, पुरुषोत्तम नलगे, पाशा शेख, ॲड. समियोद्दीन पटेल, इस्माईल शेख, मुज्जमिल शेख, जयराज कसबे, नियामत लोहारे, उस्मान सिद्दिकी, मोहसीन शेख, अजहर पटेल आदींची उपस्थिती होती.

एमआयएमही आक्रमक...उन्हाळ्याच्या सुरुवातीला शहरात पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घंटागाड्याही बंद आहेत. त्यामुळे पालिकेला कुलूप ठोकण्याचा इशारा एमआयएमचे मुज्जफरअली सय्यद यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल...पालिकेने थकित वीजबिलापोटी ८ लाख भरले आहेत. जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा महावितरणने बंद केल्यामुळे ७ ते ८ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. वीजबिल भरल्यामुळे महावितरणने खंडित केलेला वीजपुरवठा सोमवारी सुरू केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून शहराला पूर्ववत पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता सोनवणे यांनी दिली.

टॅग्स :laturलातूर