शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लातूरमध्ये अँटीरेबीज लसीकरणाची मोहीम बारगळली?  भ्रमणध्वनीवर प्रतिसाद मिळेना

By हणमंत गायकवाड | Updated: March 20, 2024 16:36 IST

लातूर शहरामध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

लातूर: भटक्या श्वानांचा त्रास कमी करण्यासाठी महानगरपालिका आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन च्या सहकार्याने अँटीरेबीज लसीकरण मोहीम सुरू केल्याचा गाजावाजा करण्यात आला. नागरिकांना संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. परंतु त्यावर वारंवार कॉल करूनही संबंधित यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नाही. किंबहुना भ्रमणध्वनीच उचलला जात नाही. मग अँटीरेबीज लसीकरणाची मोहीम कुठे चालू आहे,असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

लातूर शहरामध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रात्रीच्या वेळी या श्वानांची टोळी रस्त्याने फिरत असते. रस्त्याने ही टोळी फिरत असताना यावेळी दुचाकी आली तर तिचा पाठलाग श्वान करतात. यामुळे दुचाकीस्वार घाबरून दुचाकीची स्पीड वाढवितो. परिणामी,अपघात होऊन गंभीर जखमी होण्याच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. वृद्ध नागरिक, महिला, पुरुष तसेच शाळकरी मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे अनेक उदाहरणे आहेत. याला आवर घालण्यासाठी महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभाग आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने अँटीरेबीज लसीकरणाची मोहीम सुरू केल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांनी जाहीर केलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तर प्रतिसाद मिळत नाही. फोन उचलला जात नाही, त्यामुळे भटक्या श्वानांची माहिती कोणाला द्यायची असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

८६५५३२३१६८ या क्रमांकावर संपर्क साधला तर कोणीही उचलेना ! महानगरपालिका आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने भटक्या श्वानांची माहिती देण्यासाठी ८६५५३२३१६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार संपर्क साधला तरी हा मोबाईल उचलला जात नाही. दरम्यान, ७३८५२२६८८८, ७७२०९७ ०५०६ व ८६६८७६९८२७ या क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवरून भटक्या श्वानांची माहिती देण्यासाठी वारंवार प्रस्तुत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, परंतु भ्रमणध्वनी उचलला नाही. मग संपर्क साधण्याचे आवाहन कशासाठी? लातूर शहरातील प्रभागात जाऊन भटक्या श्वनांना लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले असले तरी फोन उचलला जात नाही. दर शनिवारी त्या त्या परिसरात जाऊन अँटीरेबीज लसीकरण करणे महानगरपालिकेचा मनोदय आहे. त्यासाठी नागरिकांनी आपल्या भागातील भटक्या श्वानांची माहिती या क्रमांकावर द्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

वृद्ध नागरिक,लहान मुलांना भटक्या श्वानांचा त्रास वृद्ध नागरिक,लहानमुलेवमहिलांनाभटक्याश्वानांचात्रासआहे. अँटीरेबीज लसीकरण तसेच निर्बीजीकरणनुसताच फार्स करण्यात आलेलाआहे वास्तवातकामठप्पआहे. ज्यासंस्थेकडेहेकाम मनपाने सोपवले आहे. त्यासंस्थेवर मनपाचे नियंत्रण नाही. हे यावरून सिद्ध होत आहे.

टॅग्स :laturलातूरdogकुत्रा