शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
3
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
4
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
5
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
6
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
7
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
8
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
9
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
10
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
11
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
12
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
13
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
14
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
15
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
16
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
17
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
18
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
19
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
20
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!

बळीराजाचीच घरगुती बियाणे बँक; खरिपाच्या खर्चात बचत !

By हरी मोकाशे | Published: June 05, 2023 6:19 PM

बीज प्रक्रियेवर भर : ६ लाख हेक्टरवर पेरा अपेक्षित

लातूर : खरीप हंगामासाठी खर्च कमी व्हावा, तसेच शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या घरगुती बियाणांचा वापर करावा म्हणून कृषी विभागाच्यावतीने गेल्या दोन-तीन वर्षांपासून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. यंदाच्या खरिपासाठी सोयाबीनचे ३ लाख ६७ हजार ५०० क्विंटल बियाणे आवश्यक आहे. सध्या शेतकऱ्यांकडे २ लाख ३८ हजार ८७५ क्विंटल पेक्षा अधिक बियाणे उपलब्ध असल्याने शेतकरीच बियाणे बँक ठरत आहेत.

जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ५ लाख ९९ हजार ९०० हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक पेरा नगदी पीक असलेल्या सोयाबीनचा होतो. जवळपास ४ लाख ९० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवून त्यादृष्टीने नियोजन केले आहे. त्यापाठोपाठ तुरीचा ९० हजार हेक्टरवर पेरा होणे अपेक्षित आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणांची मदार ही विविध बियाणे कंपन्यांवर होती. मात्र, तीन- चार वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात कंपनीचे बियाणेही उगवले नसल्याच्या तक्रारी झाल्या. परिणामी, कृषी विभागाने घरगुती बियाणांच्या वापराकडे लक्ष केंद्रित केले.

सोयाबीनच्या घरगुती बियाणांचा वापर वाढावा. तसेच शेतकऱ्यांची बियाण्यांसाठीच्या होणाऱ्या खर्चात काही प्रमाणात बचत व्हावी म्हणून गेल्या दोन- तीन वर्षांपासून कृषी विभागाने गावोगावी- शेती बांधावर जाऊन बीज प्रक्रिया करून घरगुती बियाणांचा वापर करण्याबाबत जनजागृती केली. त्यामुळे घरगुती सोयाबीन बियाणांचा वापर वाढला आहे.

२ लाख ३८ हजार क्विंटल घरगुती बियाणे...जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा ४ लाख ९० हजार हेक्टरवर होणे अपेक्षित आहे. त्यासाठी ३ लाख ६७ हजार ५०० क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. दरम्यान, काही शेतकरी बियाणे बदल करतात म्हणून कृषी विभागाने शासनाकडे विविध कंपन्यांच्या १ लाख २८ हजार ६२५ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. उर्वरित २ लाख ३८ हजार ८७५ क्विंटल सोयाबीन बियाणे हे घरगुती वापरले जाणार आहे.

तुरीचा पेरा ९० हजार हेक्टरवर...सोयाबीनपाठोपाठ तुरीचे उत्पादन घेतले जाते. यंदा ९० हजार हेक्टरवर तुरीचा पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. ज्वारी २० हजार हेक्टर, मूग १० हजार हेक्टर, उडीद पिकाचा ८ हजार हेक्टरवर पेरा होण्याचा अंदाज आहे. तसेच अहमदपूर आणि जळकोट तालुक्यात काही प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. त्यासाठी १३ हजार पॉकेट कापूस बियाणे उपलब्ध झाले आहे.

शेतकऱ्यांनी काळजी करू नये...यंदाच्या खरिपात कुठल्याही बियाणांचा तुटवडा जाणवणार नाही. मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. घरगुती बियाणांचा अधिकाधिक वापर करावा. त्यामुळे आर्थिक फायदाही होईल.- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर