शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

रोहयो कामांवर बीडीओंचा बहिष्कार; ३५० ग्रामपंचायतीतील मजुरांसह लाभार्थी शेतकऱ्यांची गैरसोय

By संदीप शिंदे | Published: May 04, 2023 2:12 PM

ग्रामपंचायत स्तरावरील १२०० कामे बंद पडली आहेत

लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील अनेक जबाबदाऱ्या शासनाने गटविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर टाकल्या आहेत. याला विरोध दर्शविण्यासाठी जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी राेहयोच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी, जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेली जवळपास १२०० कामे ठप्प असून, या कामावर कार्यरत असलेल्या १३ हजार ५०० मजुरांची गैरसोय सुरू आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती विभागाकडून गावस्तरावर विविध कामे केली जात आहेत. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ११०० कामे सुरू होती. यामध्ये १३ हजार ५०० मजूर कार्यरत होते. परंतु शासनाने रोहयोंतर्गत कामातील जबाबदारीत बदल केले आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील साप्ताहिक हजेरी यापूर्वी रोजगार सेवक करीत होता. त्यावर ग्रामसेवक प्रतिस्वाक्षरी करीत होते. मात्र, आता रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करताना कुशल व अकुशल कामांचे ६०.४० टक्के प्रमाण राखण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून, बीडीओंकडून इतर कामांचा ताण पाहता मजुरांचे मस्टर पडताळणी व इतर कामांमध्ये अधिक देता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. या मागण्यांसाठीही बीडीओंनी ग्रामपंचायत स्तरावरील रोहयोच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी, ग्रामपंचायत स्तरावरील कामे बंद आहेत.

या कारणांमुळे कामांवर बहिष्कार...मजुरांच्या उपस्थितीबाबत गटविकास अधिकारी जबाबदार राहणार नाहीत, याबाबत शासन आदेश निर्गमित करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत ग्रामपंचायत स्तरावरील जबाबदारी निश्चित करणे, राज्य स्तरावरून मंजूर करण्यात येत असलेल्या कामांच्या बाबतीत मंजुरीबाबत ६०.४० चे प्रमाण राखण्याबाबत गटविकास अधिकारी जबाबदार राहणार नाहीत, याबाबत आदेश जारी करावा. ग्रामपंचायत स्तरावर यंत्रणा असताना बीडीओंच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्यात येत असून, यासह इतर मागण्यांसाठी बहिष्कार टाकण्यात आला आहे.

आमच्या कुटुंबाचा गाडा कसा चालवावा..?बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना राबविली जाते. त्यानुसार आमच्या हाताला गावातच काम उपलब्ध झाले. मात्र, गटविकास अधिकारी यांनी कामावर बहिष्कार टाकलेला असल्याने मागील काही दिवसांपासून कामे बंद आहेत. त्यामुळे काम केल्यावर मिळणारी मजुरी बंद झाली आहे. हाताला काम नाही, अवकाळीमुळे शेतात पण कामाला कोणी बोलवत नाही. परिणामी, कुटुंबाचा गाडा आम्ही कसा चालवावा, असा सवाल मजुरांमधून उपस्थित केला जात आहे.

ग्रामपंचायत स्तरावर चालतात ही कामे...रोहयो अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर खासगी, सार्वजनिक विहिरींची कामे, मातोश्री पाणंद शेत रस्त्याची कामे, बांधावर वृक्षलागवड, शोषखड्ड्यांची कामे, शेततळे यांसह विविध कामे चालतात. उन्हाळ्यात या कामांना वेग येतो. त्यामुळे अनेकांच्या हाताला रोजगारही मिळतो. मात्र, ही कामे ठप्प असल्याने मजुरांना कामासाठी इतरत्र शोधाशोध करावी लागत आहे. बीडीओ साहेबांचा बहिष्कार कधी संपणार, असा सवालही मजुरांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीagricultureशेती