शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

टोमॅटोच्या पिकावर किडीचा हल्ला, ताेडणी नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 7:52 AM

हिवाळ्यातील लागवडीपासून पंखाडे व अळीने टोमॅटोवर हल्ला केला आहे.

- बालाजी थेटे

औराद शहाजानी (जि. लातूर) : मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असल्याने शासनाने एक जिल्हा, एक पीक योजनेत टोमॅटोची निवड केली आहे. मात्र, दाेन महिन्यांपासून या पिकावर पाने, फळ पाेखरणाऱ्या टुटा अळीने हल्ला केल्याने हजारो हेक्टरवरील पीक फस्त झाले आहे. त्यात शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

औराद शहाजानी, वडवळ ना.,जानवळ, नळेगाव, अंबुलगा, हेर, लातूर राेड, निटूर, सावरी, तगरखेडा, डाेंगरगाव, किल्लारी, औसा आदी भागातील शेतकरी नगदी पीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेतात. जिल्ह्यातील टोमॅटोला दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, जम्मू- कश्मीर, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशात माेठी मागणी असते. पावसाळ्यात गावरान तर हिवाळा व उन्हाळ्यात वैशाली जातीच्या टोमॅटोची लागवड केली जाते.

हिवाळ्यातील लागवडीपासून पंखाडे व अळीने टोमॅटोवर हल्ला केला आहे. टुटा अळीचे पतंग हे लाखाेंच्या संख्येत शेतात येत आहेत. अळीचा सकाळच्यावेळी गोंगाट असतो. हे पतंग मोठ्या प्रमाणात अंडी घालत असून त्यातून अळी तयार हाेऊन ती पाने, फळे कात्रत आहे. नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करूनही फारसा उपयोग होत नाही.

कृषी विद्यापीठाचे शास्त्र व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबुलगा, औराद शहाजानी, तगरखेडा, हलगरा येथे भेटी पाहणी केली. पथकात शास्त्रज्ञ प्रा. अरुण गुट्टे, डॉ. विनोद शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी महेश क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, हरिभाऊ नागरगोजे, गायकवाड, कृषी अधिकारी बावगे, मंडळ कृषी अधिकारी एच.एम. पाटील होते.शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेऊन उपाययोजनेवर चर्चा केली. टोमॅटोवरील टुटा अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुमने घेतले. त्यावर विद्यापीठात संशोधन केले जाणार असल्याचे डॉ. अरुण गुट्टे यांनी सांगितले.

अडीच महिन्यांत १४ फवारण्या...औरादचे शेतकरी मुरली बाेडंगे म्हणाले, अडीच महिन्यात १४ फवारण्या केल्या. पण कीड नियंत्रणात आली नाही. टोमॅटोवर यावर्षीसारखी कीड मी २५ वर्षांत पाहिली नाही. उत्पादन निघालेच नाही, उलट कीड नियंत्रणासाठी खर्च वाढला. किडीमुळे हा शेतमाल विक्रीसाठी बाजारातही घेऊन जाता येत नसल्याने तो झाडावर आहे, असे वडवळ येथील शेतकरी उबेद पटेल म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर