शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा ‘बीजेएस’चा निर्धार- शांतिलाल मुथ्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 01:46 IST

६ कोटी क्युबिक मीटर जलसाठ्याची क्षमता वाढविणार

लातूर : भारतीय जैन संघटनेने जूनअखेरपर्यंत राज्यातील बुलडाणा, लातूर, उस्मानाबाद, अकोला व वाशिम हे पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. जलसंधारणाची कामे करून ६ कोटी क्युबिक मीटरपेक्षा जास्त जलसाठा वाढविला जाणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी गुरुवारी येथे पत्रपरिषदेत दिली.मुथ्था म्हणाले, भारतीय जैन संघटना ३३ वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक कार्यात सहभागी आहे. किल्लारीतील भूकंपानंतर तेथील १० हजार नागरिकांना दररोज भोजन दिले. तसेच १ हजार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले होते. महाराष्ट्र सहा वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आहे. त्यामुळे भारतीय जैन संघटनेने दुष्काळमुक्त अभियान राबविण्यास सुरुवात केली. २०१३ मध्ये बीड जिल्ह्यातील ११७ तलावांतून २० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे ५ हजार एकर शेतजमीन सुपीक झाली. त्यानंतर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत नाला रुंदीकरण व खोलीकरणाची कामे करण्यात आली. पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० तालुक्यांतील गावांना ५०० मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या.२०१८ च्या पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेतील ७५ तालुक्यांतील दीड हजार गावांना १६२५ जेसीबी मशीन भाड्याने घेऊन उपलब्ध करून देण्यात आल्या. या मशीनचा ८ लाख ५२ हजार तास वापर झाला. त्यामुळे ५ कोटी क्युबिक मीटर जलसाठ्याची क्षमता वाढली. ३ मार्च २०१८ रोजी बुलडाणा येथे १३४ जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध करून कामास सुरुवात केली. तीन महिन्यांच्या कालावधीत ५० लाख क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात दुष्काळ मुक्ती अभियानचे उद्घाटन ३० सप्टेंबर रोजी किल्लारी येथे होईल.शासनाकडून डिझेल पुरवठालोकसहभाग, लोकप्रतिनिधी, सरकारी यंत्रणेची मदत तसेच सेवाभावी संस्था, सीएसआर कंपन्यांच्या सहकार्यातून कामे केली जाणार आहेत. शासनाने डिझेल पुरवठा करावा, असा करारही झाला आहे. भारतीय जैन संघटना जेसीबी, पोकलेन मशीन उपलब्ध करून देऊन कामावर देखरेख ठेवेल. जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे मॉडेल तयार करून त्यानुसार काम करण्यात येणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळShantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशन