शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बाजारात तेजी पण शेतकऱ्यांकडे तूर नाही; दराची धाव उच्चांकाकडे!

By हरी मोकाशे | Updated: May 18, 2024 19:54 IST

शेतकऱ्यांकडे तूरच नाही : सर्वसाधारण भाव १२ हजार रुपये

लातूर : तुरीचे उत्पादन कमी झाल्याने बाजार समितीत आवकही घटली आहे. त्या तुलनेत मागणी वाढल्याने तुरीच्या दरात वाढ होत आहे. शनिवारी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सर्वसाधारण १२ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळाला आहे. आगामी काळात आणखीन दरवाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गत खरीप हंगामात उशीरा पाऊस झाल्याने पेरण्यांनाही विलंब झाला होता. जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरपैकी सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. तो ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर होता. तुरीचे क्षेत्र १ लाख १ हजार ७१६ हेक्टर असले तरी प्रत्यक्षात केवळ ६४ हजार ३९६ हेक्टरवर पेरा झाला होता. तो ६३ टक्के असा होता. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने उत्पादनात घट झाली होती.

कमाल भाव १२ हजार ४२६ रुपयांवर...तारीख - आवक - कमाल - किमान - सर्वसाधारण१८ मे - १३६१ - १२४२६ - ११००० - १२०००१७ मे - २२७४ - १२२५१ - ९८०० - ११८००१६ मे - २१४० - १२३०० - ११७०१ - ११५००१५ मे - १५५२ - ११९०१ - १०९५० - ११०००१४ मे - १७८१ - १२०७७ - ९००० - ११८००१३ मे - १८३४ - १२००० - १०३३४ - ११६००११ मे - १५९२ - ११७०१ - १०९०० - ११२००

एप्रिलपासून दरवाढीस प्रारंभ...लातूरच्या बाजार समितीत जिल्ह्याबरोबर परजिल्ह्यातील आणि कर्नाटक, तेलंगणा राज्यातील शेतमालाची आवक होते. गत खरीपात पेरा घटल्याने आणि कमी पर्जन्यमान झाल्याने उत्पादनातही घट झाली. परिणामी, एप्रिलपासून तुरीच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. १० एप्रिल रोजी कमाल १२ हजार ३१ रुपये तर सर्वसाधारण ११ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता.

उत्पादन कमी झाल्याने दरात वाढ...मागील खरीप हंगामात तुरीचे उत्पादन कमी झाले होते. त्याचबरोबर गत वर्षीच्या खरीपातही पेरा वाढला नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून तूर शिल्लक नाही. दरम्यान, तूर काढणीनंतर बहुतांश शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणींमुळे विक्री करण्यास सुरुवात केली. परिणामी, दरात वाढ झाली नाही. आता शेतकऱ्यांजवळी जवळपास ७५ टक्के तूर विक्री झाली आहे. उर्वरित तूर बी- बियाणांसाठी ठेवली आहे. सध्या बाजारात आवक कमी झाल्याने आणि ग्राहक अधिक असल्याने दरात वाढ झाली आहे.- नितीन कलंत्री, दाळ उत्पादक.

बाजारात तेजी पण शेतकऱ्यांकडे तूर नाही...परतीचा पाऊस न झाल्याने तूर उत्पादन घटले. सुरुवातीस भावही नव्हता. आता बाजारात तुरीच्या भावात तेजी आली आहे. परंतु, शेतकऱ्यांकडे तूर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.- मुरली बोंडगे, शेतकरी.

टॅग्स :laturलातूरMarketबाजार