शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

बीएड सीईटीत गोंधळ; आधी म्हणाले परीक्षा कालच झाली, नंतर केले दुसऱ्या गावच्या केंद्रात नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 2:30 PM

बीएड प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख अन् केंद्र बदलामुळे विद्यार्थ्यांची धावाधाव

- गोविंद इंगळेनिलंगा (जि. लातूर) : बीएड प्रवेशपूर्व परीक्षेसाठी निलंगा केंद्र असलेले जवळपास १२५ विद्यार्थी बुधवारी सकाळी केंद्रावर पोहोचले. मात्र, तेथील केंद्र प्रमुखांनी तुमची परीक्षा मंगळवारी होती, असे सांगितले असता या परीक्षार्थींचा गाेंधळच उडाला. दरम्यान, केंद्र प्रमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षा घेत असलेल्या कंपनीस तात्काळ माहिती दिली. कंपनीने निलंग्याऐवजी लातूर आणि आलमला येथील केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी, असे सांगितल्याने या विद्यार्थ्यांची मोठी धावपळ उडाली.

बीएड प्रवेशपूर्व परीक्षेसाठी निलंग्यातील महाराष्ट्र महाविद्यालयाचे केंद्र आहे. त्यामुळे या केंद्रावर जिल्ह्यातून तसेच नांदेड जिल्ह्यातून जवळपास १२५ विद्यार्थी बुधवारी सकाळी परीक्षेसाठी आले होते. केंद्र प्रमुखांनी तुमची परीक्षा २५ एप्रिल रोजी होती असे ऑनलाईवर होते असे सांगितले. तेव्हा विद्यार्थ्यांनी हॉल तिकिट दाखवून २६ रोजी परीक्षा असल्याचे म्हणाले. मात्र, केंद्रप्रमुखांनी परीक्षेस बसता येणार नाही, असे म्हणाल्याने गोंधळ उडाला. तेव्हा विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली.

यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले. निवेदनावर रोहिणी देशमुख, जान्हवी ढगे, दिगंबर गायकवाड, शाहिस्ता बेगम करीम बागवान, गजानन सोळुंके, वर्षाताई आडे, शितल गोरे, चैताली मंगनाळे, राजनंदिनी मोरे, सतीश मद्देवार, गिरीधर पंदीलवाड, लक्ष्मण पंदीलवाड, दीपक सोनकांबळे, आशुतोष जाधव, संदीप जाधव, शुभम पांचाळ, माधव बर्डे, चंद्रशेखर क्षीरसागर, कृष्णा क्षीरसागर यांच्यासह जवळपास १२५ विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

परीक्षार्थी झाले आक्रमक...या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा केंद्राकडे माेर्चा वळवित केंद्रप्रमुख आणि प्राचार्य एम. एन. कोलपुके यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी परीक्षार्थींची यादी तयार करुन परीक्षा घेण्याऱ्या संबंधित कंपनीस पाठविले. कंपनीने सदरील परीक्षा नंतर घेण्यात येईल, असे सांगितले. तेव्हा आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला ये- जा करण्यासाठी झालेला खर्च द्यावा, अशी मागणी करण्यास सुरुवात केली. अखेर कंपनीने विद्यार्थ्यांना परीक्षा आजच होती. मात्र, त्यासाठी लातूर व आलमला येथील केंद्रावर दोन तासांत पोहचण्यास सांगितले. तसेच परीक्षार्थींचा निलंग्याहून जाण्याचा प्रवास खर्च कंपनी करणार असेही सांगितले. तेव्हा परीक्षार्थींनी आलमला व लातूरकडे धाव घेतली.

परीक्षेसाठी सतत त्रास...परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपन्या ऐनवेळी असाच गोंधळ घालतात. त्याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्नही परीक्षार्थींनी केला.

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूर