शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

पीकविमा कंपनी प्रशासनास जुमानेना; ११ मंडळांना अग्रीम देण्यास टाळाटाळ!

By हरी मोकाशे | Published: November 27, 2023 9:29 PM

२ लाख १९ हजार शेतकऱ्यांना भरपाई...

लातूर : दीपावलीपूर्वी विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील ४३ महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारकांना नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. दरम्यान, पीकविमा कंपनी आता ३२ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर आगाऊ रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. ११ मंडळांना अग्रीम देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे पीकविमा कंपनी प्रशासनास जुमानत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

खरिपात जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने खरिपातील सोयाबीन उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच्या सर्व म्हणजे ६० महसूल मंडळांतील सोयाबीन पीक विमाधारकांना २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश दिले होते. तेव्हा पीकविमा कंपनीने आक्षेप घेतल्याने छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समितीची बैठक झाली.

बैठकीत पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीने ६० पैकी ४३ महसूल मंडळांना अग्रीम देण्यास तयार असल्याचे सांगितले, तर उर्वरित १७ मंडळांसाठी पुनर्मूल्यांकन करून सुधारित निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली. आता पीकविमा कंपनीने ४३ पैकी केवळ ३२ मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम जमा करण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित ११ मंडळांना आगाऊ रकमेसाठी टाळाटाळ सुरू केली आहे.

२ लाख १९ हजार शेतकऱ्यांना भरपाई...पीकविमा कंपनीने ३२ महसूल मंडळांतील २ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर २१५ कोटी जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यात तांदुळजा, हरंगुळ बु., कन्हेरी, मुरूड, गातेगाव, कासारखेडा, चिंचोली ब., बाभळगाव, लातूर, भुतमुगळी, मदनसुरी, पानचिंचोली, कासार बालकुंदा, निलंगा, निटूर, हिसामाबाद, बेलकुंड, किनीथोट, उजनी, औसा, भादा, लामजना, तोंडार, उदगीर, झरी, चाकूर, आष्टा, वडवळ ना., नळेगाव, शेळगाव, कारेपूर, घोणसी मंडळाचा समावेश आहे.

ही अकरा मंडळे वंचित...कासार शिरसी, औराद शहाजानी, साकोळ, किल्लारी, नागलगाव, नळगीर, रेणापूर, पोहरेगाव, पानगाव, जळकोट आणि शिरूर ताजबंद ही अकरा महसूल मंडळे अग्रीमपासून वंचित राहत आहेत.

काहींना दिलासा, तर काहींना प्रतीक्षा...जिल्ह्यातील ३२ महसूल मंडळांतील २ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आगाऊ रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे. त्यामुळे अग्रीम कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रभारी कारभारामुळे उदासीनता...जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा कारभार हा प्रभारींवरच सुरू आहे. त्यामुळे उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. नियमित अधिकारी येतील आणि हा तिढा सोडवतील अशी प्रभारींची मानसिकता असल्याची चर्चा होत आहे. त्याचा परिणाम मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होत आहे. हे प्रभारी कोणाचे 'लाडके'? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :laturलातूर