शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

प्रशासकराजमुळे अडला कोट्यवधीचा निधी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अनुदान थकित

By हरी मोकाशे | Updated: March 28, 2024 17:01 IST

दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर दोन वर्षांपासून प्रशासक असल्याने १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत मिळणाऱ्या विकास निधीला तात्पुरती कात्री लागली आहे.

लातूर : ग्रामीण भागाच्या विकासासाठी १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत केंद्र शासनाकडून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीस कोट्यवधीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. दरम्यान, दोन वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासकराज आहे. परिणामी, या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनुदान थकित राहिले आहे.

जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता होती. या सत्ताधाऱ्यांचा कार्यकाल २१ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला आहे. दरम्यान, याच कालावधीत जिल्ह्यातील दहाही पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपला. त्यामुळे जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तर पंचायत समितीवर गटविकास अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर दोन वर्षांपासून प्रशासक असल्याने १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत मिळणाऱ्या विकास निधीला तात्पुरती कात्री लागली आहे. परिणामी, कोट्यवधीचा निधी थकित राहिला आहे.

दोन प्रकारांमध्ये निधीची उपलब्धता...१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार १ एप्रिल २०२० पासून केंद्र शासनाकडून बंधित व अबंधित अशा दोन प्रकारात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. बंधित प्रकारात ६० टक्के अनुदान देण्यात येते. त्यातून स्वच्छता आणि पाणंदमुक्त गाव, पाणीपुरवठा, जलपुनर्भरण करणे असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. तसेच अबंधित प्रकारात ४० टक्के अनुदान दिले जाते. हा निधी स्थानिक गरजेनुसार आवश्यक बाबींवर वापरता येतो.

ग्रामपंचायतींच्या खात्यावर ४४० कोटींचा निधी...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत आतापर्यंत १६ हप्त्यांद्वारे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी एकूण ४३९ कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा निधी वेळेत खर्च करण्यात यावा म्हणून जिल्हा परिषदेकडून सातत्याने सूचना करण्यात आल्या आहे.

जिल्हा परिषदेस २८ कोटी ६३ लाख...१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के, पंचायत समितीस १० टक्के तर जिल्हा परिषदेस १० टक्के निधी वितरित करण्यात येतो. त्यानुसार सन २०२० ते २०२२ या कालाधीत ८ हप्त्यांद्वारे प्रत्येकी २८ कोटी ६३ लाखांचा निधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीस वितरित करण्यात आला आहे.

थकित निधीचा नवीन पदाधिकाऱ्यांना लाभ...जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक असल्याने सन २०२२ पासून निधी वितरित करण्यात आला नाही. हा निधी नवीन पदाधिकारी आल्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामांसाठी मिळेल, असे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद