शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

कावळ्यांचा मृत्यू ना बर्ड फ्ल्यू,ना मानमुडीने! चार दिवसांत ४२ कावळे दगावल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:08 IST

प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त : प्रशासन, नागरिकांना मिळाला दिलासा

लातूर : अचानकपणे कावळे दगाविण्याच्या घटनेमुळे उदगिरात भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. दरम्यान, मृत कावळ्यांच्या वैद्यकीय नमुन्यांचा तपासणी अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून तो बर्ड फ्लू आणि मानमुडी निगेटिव्ह आहे. त्यामुळे धास्ती कमी झाली असली तरी कावळ्यांचा मृत्यू विषारी द्रवामुळे की सडलेले खाल्ल्याने झाला, याचा शोध पशुसंवर्धन विभाग घेत आहे.

उदगिरात सोमवारी अचानकपणे २८ कावळे मृतावस्थेत आढळले, तसेच मंगळवारी ८, तर बुधवारी ५ कावळे मृतावस्थेत आढळले. त्याची दखल घेत पशुसंवर्धन विभागाने मृत कावळ्याचे वैद्यकीय नमुने पुणे-औंध येथील राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडे पाठविले. दरम्यान, मयत कावळ्यांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली, तसेच उदगीर तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या. प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष लागून होते.

आणखीन एक कावळा दगावलाउदगिरात गुरुवारी आणखीन एक कावळा दगावला आहे. मयत कावळ्यांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. दरम्यान, उपाययोजनेसाठी जिल्हास्तरावर शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे.

बर्ड फ्लू निगेटिव्हमुळे चिंता दूरऔंध-पुणे येथील राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला असून बर्ड फ्लू आणि मानमुडी निगेटिव्ह आहे. त्यामुळे चिंता कमी झाली आहे. कारण बर्ड फ्लू पॉझिटिव्ह अहवाल आला असता तर अधिक काळजी घ्यावी लागली असती. शिवाय, हा आजार माणसांमध्येही पसरण्याची भीती असते, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी सांगितले.

विषबाधा, विषाणूंचा आजार...?विषारी औषध अथवा सडलेले खाल्ल्यामुळे कावळ्यांचा मृत्यू झाला का, हे प्रयोगशाळेत तपासले जात आहे. अहवालानंतर कावळ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजून येईल. दरम्यान, उदगीर पालिकेस स्वच्छतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.- डॉ. श्रीधर शिंदे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन.

टॅग्स :laturलातूर