शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

शेती पिकांचे नुकसान; नदीवरील पुलावरून पावसाचे पाणी, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 8:38 AM

वाहतूक ठप्प : शेती पिकांना बसला फटका

किनगाव (जि. लातूर) : किनगावसह परिसरात शुक्रवार दुपारी जवळपास एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेत- शिवारातून पाणीच पाणी वाहत होते. दरम्यान, खानापूर नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने किनगाव- लातूर मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

किनगावहून लातूरला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग हा कारेपूर मार्गे आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते. किनगावजवळील खानापूर नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. शुक्रवारी दुपारी या भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले. परिणामी, काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणारे वाहनधारक पर्यायी मार्गाचा अवलंब करीत असल्याचे पहावयास मिळाले. या पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुुळे पुलाची उंची वाढवून दुरुस्ती करण्यात यावी, अशी या भागातील नागरिक, वाहनधारकांकडून सातत्याने मागणी होत आहे.

यापूर्वीही झाली होती वाहतूक ठप्प...

यापूर्वीही ९ जुलै रोजी मोठा पाऊस झाल्याने चार ते पाच तास पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. हा पूल जुना असून पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलावरून कमी प्रमाणात पाणी वाहताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, छोटे- मोठे अपघात घडत आहेत. पुलाची उंची वाढवून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी