शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
2
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
3
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
4
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
5
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
6
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
7
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
8
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
9
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
10
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
11
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
12
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
13
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
14
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
15
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
16
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
17
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
18
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
19
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
20
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 

जुन्या जीर्ण इमारतींपासून धोका, मनपाने दिल्या १३० जणांना नोटिसा; तीन ठिकाणी सील

By आशपाक पठाण | Published: July 23, 2023 7:51 PM

यातून काही दुर्घटना होऊ नये, म्हणून मनपाच्या वतीने या भागात १३० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय, तीन ठिकाणी सील करण्यात आले आहे.

 

लातूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गावभागासह प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई भागात अनेक जीर्ण इमारती आहेत. पावसामुळे अनेकांच्या भिंतीत पाणी मुरत असल्याने धोका निर्माण झाला आहे. यातून काही दुर्घटना होऊ नये, म्हणून मनपाच्या वतीने या भागात १३० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय, तीन ठिकाणी सील करण्यात आले आहे.

लातूर शहरातील गाव भागात व बाजारपेठेत अनेक जुन्या व शंभर वर्षापुर्वीच्या ईमारती आहेत. त्या अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. या जुन्या ईमारती दगडी बांधकामाच्या असून त्यांचा काही भाग हा कोसळलेलाही आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसात अशा जीर्ण झालेल्या ईमारतींना अधिक धोका असतो. पावसाचे पाणी मुरल्याने अशा जीर्ण ईमारती पडून त्यामध्ये राहणाऱ्या नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो. गावभाग, गंजगोलाई परिसरात असलेल्या अशा जीर्ण व धोकादायक ईमारतीमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन या ईमारतीबाबत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने वेळीच तातडीने कारवाई करण्याच्या सूचना मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मनपा प्रशासन कामाला लागले आहे. दोन दिवसात तीन ठिकाणी सील केले आहे.

गावभागात २२ धोकादायक इमारती...

गावभागातील आझाद चौक, मिस्कीनपुरा, पटेल चौक, माळी गल्ली, तेली गल्ली, राम गल्ली, देशपांडे गल्ली आदी भागात २२ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. तसेच पडके जुने घर, भिजलेली भिंत, सामायिक भिंतीला तडे असे दिसून आल्याने जवळपास ८५ जणांना नोटिसा दिल्या आहेत. शनिवारी एका ठिकाणी सील करण्यात आल्याचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी सांगितले.

गंजगोलाईत दोन ठिकाणी कारवाई...मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या सूचनेनुसार गंजगोलाई भागात, बाजारपेठेत धोकादायक आढळून आलेल्या ४५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा गंजगोलाईतील दोन ठिकाणी तात्काळ सील करण्यात आले आहे. तसेच शेजारच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय, जुन्या घरातील लोकांनी पावसाळ्यात किमान चार महिने इतर ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, असे कळविण्यात आल्याचे क्षेत्रीय अधिकारी पवन सुरवसे यांनी सांगितले.

जीर्ण इमारतीचा शेजाऱ्यांना धोका...गंजगोलाईत बाजारपेठेत अनेक जुन्या धोकादायक इमारती आहेत. अनेकांचे बांधकाम १०० वर्षापूर्वीचे आहे. ज्यांच्यामुळे शेजाऱ्यांना धोका निर्माण होईल, अशी स्थिती आहे, अशा ठिकाणी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. भिज पाऊस सतत राहिल्यास भिंतीत पाणी मुरून धोका वाढू शकतो, अशी भिती नागरिकांतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसEnchroachmentअतिक्रमण