शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

कोरडा दुष्काळ जाहीर करा; मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By हणमंत गायकवाड | Published: August 18, 2023 6:16 PM

कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी.

लातूर : जिल्ह्यात गेल्या वीस-बावीस दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. यामुळे पिकांनी माना टाकल्या असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. याची गंभीर दखल घेऊन शासनाने लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा,या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी. या आठवड्यात शासनाने दुष्काळ जाहीर नाही केला तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही. जिल्ह्यातील शेतकरी सोबतीला घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकाचे नुकसान होत आहे. अशा शेतकऱ्यांनाही हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी. पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, यासाठी हरिण, रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा प्रतिबंध करावा. जिल्ह्यातील पिके वाळत असल्याने पीक विमा कंपनीने २५ टक्के अग्रीम रक्कम तत्काळ द्यावी. ९९२ व इतर सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकणाऱ्या विविध उत्पादन कंपन्यावर कारवाई करण्यात यावी. खत बियाणांची लिंकिंग तसेच कीटकनाशकांची विक्री चढ्या दराने करणाऱ्या कृषी दुकानदारांवर ही कारवाई करावी. गोगलगाय व इतर अन्य रोगामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तत्काळ मदत करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मंत्र्यांना फिरू देणार नाही..आठवडाभरात कोरडा दुष्काळ जाहीर न केल्यास मराठवाड्यातील कोणत्याच जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा आंदोलन दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कृषी विभागाचे अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी दिला.

शासनाच्या विरोधात घोषणाबाजी....प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, शिवकुमार नागराळे, संजय राठोड, भागवत शिंदे, मनोज अभंगे, रवी सूर्यवंशी, सचिन क्षीरसाट, प्रीती भगत, किरण चव्हाण, अंकुश शिंदे, वाहिद शेख,सचिन बिराजदार, संग्राम रोडगे, महेश बनसोडे, सोमनाथ कलशेट्टी, महेश देशमुख,श्रीनिवास शिंदे, महेश माने, अनिल जाधव,रामदास पाटील, संतोष भोपळे, सुनील तोडचिरकर, परमेश्वर पवार, जहांगीर शेख, बजरंग ठाकूर, अजिंक्य मोरे, ऋषिकेश माने, संतोष जाधव, शुभम चंदनशिवे, रामदास तेलंगे, गुरुदास घोणसे, अनिल भंडे, पवन राजे, दत्ता महात्रे, लाला मोहिते, पवन सरवदे, सचिन इगे, सुरेश गालफाडे आदींनी सहभाग घेत घोषणाबाजी केली.

टॅग्स :laturलातूरdroughtदुष्काळRainपाऊस