शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
2
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
3
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
4
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
5
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
6
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
7
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
8
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
9
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
10
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
11
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
12
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
13
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
14
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
15
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
16
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
17
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
18
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
19
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
20
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाव कमी असूनही शेतकऱ्यांची सोयाबीनलाच पसंती; लातूर जिल्ह्यात ११२ टक्के पेरा

By हरी मोकाशे | Published: July 13, 2024 7:12 PM

सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर दर ठरतात.

लातूर : गत खरीपात सोयाबीनचे उत्पादन घटले असतानाही बाजारपेठेत दर कमीच राहिला. त्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीनचे क्षेत्र कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. शिवाय, वेळेवर पाऊसही झाला. परंतु, शेतकऱ्यांनी सोयाबीनलाच पसंती दिली असून आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८२ हजार ५३६ हेक्टरवर म्हणजे ११२ टक्के पेरा झाला आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात उशीरा पाऊस झाला. तद्नंतर पावसाने मोठा ताण दिला. परिणामी, उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. उत्पादन घटल्याने दरात चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, सोयाबीन काढणीपासून ते दीपावलीच्या कालावधीपर्यंत चांगला दर राहिला. त्यानंतर मात्र, सातत्याने दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. नव्या खरीप हंगामाच्या तोंडावर भाव वाढतील, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. सातत्याने ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर राहिला.

५ लाख ८८ हजार हेक्टरवर पेरणी...पीक - पेरणीसोयाबीन - ४८२५३६तूर - ७०९२६मूग - ६८४४उडीद - ५८४४कापूस - १६१८६सूर्यफुल - १८कारळ - ५५तीळ - १३८भुईमूग - १५३ज्वारी - ३६६१बाजरी - १९९मका - २२७८

तीन तालुक्यांत शंभर टक्के पेरणी...तालुका - पेरणी (टक्के)लातूर - १०९.७८औसा - १०३.२९अहमदपूर - ९४.०६निलंगा - ८९.४४शिरुर अनं. - ९४.३४उदगीर - ९४.९८चाकूर - १०२.१७रेणापूर - ९९.१२देवणी - ९४.२३जळकोट - ९९.०६एकूण - ९८.१३

आतापर्यंत सरासरी २१३ मिमी पाऊस...जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१३.८ मिमी पाऊस झाला आहे. लातूर तालुक्यात ३४३.४, औसा- ३४४.५, अहमदपूर- २८०.६, निलंगा- ३०३, उदगीर- १९७.८, चाकूर- २९४.९, रेणापूर- ३६७.४, देवणी- २१२.४, शिरुर अनंतपाळ- २२८.४, जळकोट तालुक्यात १७०.४ मिमी पाऊस झाला आहे.

सोयाबीन नगदी पीक...गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे पीक पध्दतीत बदल झाला आहे. सध्या नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल आहे. दोन वर्षापासून दर कमी असले तरी आगामी काळात भाव वाढण्याची आशा आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी केली आहे.- हनुमंत शेळके, शेतकरी.

सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक...सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर दर ठरतात. विदेशात सोयाबीन, पेंड याच्या मागणीनुसार दर मिळत असतो. त्याचा स्थानिक बाजारपेठेवर परिणाम होत असतो, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सरासरीपेक्षा अधिक पेरा...यंदा जिल्ह्यात ४ लाख २८ हजार १२१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात ४ लाख ८२ हजार ५३६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. वेळेवर पाऊस झाल्याने उडीद, मूग, तुरीचेही क्षेत्र वाढले आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र