शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

मधुमेह, धुम्रपान, कमी वजन; लातूर जिल्ह्यातील सव्वातीन लाख व्यक्ती क्षयरोगाच्या अतिजाेखमीत!

By हरी मोकाशे | Published: August 06, 2024 12:46 PM

लातूर जिल्ह्यात गृहभेटीतून १६ लाख नागरिकांचे सर्वेक्षण

लातूर : मधुमेह, धुम्रपान, कमी वजन अशा कारणांमुळे जिल्ह्यातील १८ वर्षांपुढील ३ लाख २८ हजार ५०६ व्यक्ती क्षयरोगाच्या अति जोखमीच्या कक्षेत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे अतिजोखमीतील व्यक्तींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.

सन २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त करण्यासाठी सर्वस्तरीय अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षय रुग्णांना मोफत गोळ्या- औषधी देण्यात येतात. तसेच पोषक आहारासाठी शासनाकडून आर्थिक मदतही दिली जाते. शिवाय, जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने निक्षय मित्र बनवून अन्नदाता उपक्रम राबविला आहे. दरम्यान, क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात व्यापक प्रमाणात मोहीम राबविण्यात आली. जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने सहा निकषानुसार जिल्ह्यात नुकतेच १८ वर्षांपुढील अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात १५ लाख ६६ हजार ९८८ व्यक्तींची माहिती घेण्यात आली असता ३ लाख २८ हजार ५०६ जण अतिजोखीम गटात आढळले आहेत.

लातुरात सर्वाधिक जोखीमग्रस्त व्यक्ती...अहमदपूर - २८६९७औसा - ४४८४७चाकूर - २५२६०देवणी - १६०९९जळकोट - १२९०६निलंगा - ३९२४२रेणापूर - १९५८१शिरुर अनं. - १७०७४उदगीर - ३५७६९लातूर - ८९०३१

सहा निकषांअधारे जिल्ह्यात सर्वेक्षण...मागील पाच वर्षांत टीबी झाला होता का, मागील तीन वर्षांत टीबी रुग्णाच्या सहवासात असलेल्या व्यक्ती, मधुमेह, धुम्रपान, वजन कमी असलेली व्यक्ती आणाि ६० वर्षांपुढील व्यक्ती अशा सहा निकषांच्या आधारे गृहभेटीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

क्षयरोगाचे सध्या जिल्ह्यात १६०३ रुग्ण...सध्या जिल्ह्यात क्षयरोगाचे एकूण १ हजार ६०३ रुग्ण आहेत. त्यांना शासनाच्या वतीने मोफत गोळ्या- औषधी देण्यात येत आहेत. तसेच सकस आहारासाठी शासनाकडून रक्कमही दिली जात आहे. त्याचबरोबर निक्षय मित्रांच्या माध्यमातून पौष्टिक आहाराचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

क्षयरोगाचा संसर्ग थुंकी, खोकल्यातून...क्षयरोगाचा संसर्ग हा थुंकी, खोकल्यामुळे हवेतून होतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, भूक मंदावणे, वजन कमी होणे, थुंकीवाटे रक्त पडणे, काखेत अथवा मानेभोवती गाठ येणे अशी क्षयरोगाची लक्षणे आहेत. क्षयरोगाचा संसर्ग रोखण्यासाठी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची लवकरात लवकर तपासणी करुन उपचार करणे महत्त्वाचे ठरते.

जिल्ह्यात लवकरच लसीकरण मोहीम...अतिजोखमीतील व्यक्तींना भविष्यात क्षयरोग होण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे शासनाच्या वतीने त्यांना मोफत बीसीजी लस देण्यात येणार आहे. लसीकरणाच्या दाेन वर्षांनंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याचे आढळून येईल.- डॉ. एस.एन. तांबारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी.

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य