शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

शेतकऱ्याची अडवणूक करू नका, व्यवहार सुरु करा; बाजार समितीने बजावल्या नोटिसा!

By हरी मोकाशे | Updated: July 11, 2024 19:54 IST

बाजार समितीची कार्यवाही : शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये

लातूर : शेतमाल खरेदीच्या पैशावरुन लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार ११ दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. दरम्यान, व्यवहार पूर्ववत सुरु करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. परंतु, तिढा कायम राहिला. परिणामी, बाजार समितीने गुरुवारपासून खरेदीदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. शेतीमालाचे व्यवहार पूर्ववत सुरु करावेत, असे नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात लौकिक असलेल्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतमाल खरेदीच्या पैश्यावरुन वाद निर्माण झाला आहे. सध्या शेतमालाची आवक कमी असली तरी दररोज जवळपास ६ ते ७ कोटी रुपयांची उलाढाल होत होती. यंदा वेळेवर खरीपाच्या पेरण्या झाल्याने पीक चांगले उगवले आहे. मात्र, काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी औषधांची फवारणी, कोळपणी, खुरपणी अशी कामे करीत आहेत. त्यासाठी पैश्याची आवश्यकता असल्याने घरातील सोयाबीनसह अन्य शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. परंतु, बाजार बंद असल्याने शेतमाल कुठे विक्री करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

११ दिवसांपासून तिढा सुटेना...पणन कायद्यानुसार शेतमाल खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी २४ तासांच्या आत आडत्यांना पैसे देणे अपेक्षित आहे. या कायद्याचे पालन करण्यात यावे, असे पत्र बाजार समितीने काढले होते. तेव्हा खरेदीदारांनी पूर्वीप्रमाणे शेतमाल खरेदी केल्यानंतर नवव्या दिवशी धनादेश दिले जाईल, असे सांगितले होते. त्यावरुनच तिढा निर्माण झाला आहे. परिणामी, १ जुलैपासून शेतीमालाचा सौदा होत नाही. दरम्यान, बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास कार्यवाही...बाजार समितीत आलेल्या शेतमालाचा व्यवहार होणे आवश्यक आहे. मात्र, १ जुलैपासून खरेदीदार सौद्यात सहभागी होत नाहीत. त्यामुळे व्यवहार ठप्प आहेत. बाजार सुरु करण्यासाठी वारंवार बैठका घेतल्या. मात्र, त्यात तोडगा निघत नसल्याने अखेर गुरुवारपासून नोटिसा बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नोटिसा प्राप्त झाल्यानंतर २४ तासांत शेतमालाच्या लिलावात खरेदीदारांनी सहभाग न घेतल्यास परवाना निलंबित, रद्द करण्याचा बाजार समितीला अधिकार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती.

६०० खरेदीदार...बाजार समितीत जवळपास ६०० खरेदीदार आहेत. या सर्वांना नाेटिसा बजावण्याची कार्यवाही सुरु आहे. सौद्यात सहभागी होण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे.- सतीश भोसले, प्रभारी सचिव.

आडत्याविना शेतमाल खरेदीस आम्ही तयार...अजून माझ्यापर्यंत नोटीस आली नाही. वैयक्तिकरित्या नोटिसा दिल्या जात असल्याचे समजले. लातूर बाजार समितीने राज्यातील इतर बाजार समितींप्रमाणे शेतमालाची थेट विक्री करण्यास सुरुवात करावी. आडत्यांच्या मध्यस्थीविना शेतमाल व्यवहारास आम्ही तयार आहोत. शेतमालाची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे दिले जातील.- पांडुरंग मुंदडा, अध्यक्ष, खरेदीदार असोसिएशन.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र