शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
3
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
4
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
5
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
6
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
7
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
8
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
9
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
10
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
11
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
12
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
13
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
14
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
15
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
16
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
17
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
18
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
19
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
20
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 

किल्लारी तालुका निर्मितीसाठी पुन्हा एल्गार; ९ ऑगस्टपासून रास्तारोको, बेमुदत साखळी आंदोलन

By संदीप शिंदे | Published: August 03, 2023 5:34 PM

शासनाकडून जाेपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी मागील ३० वर्षांपासून लढा सुरु आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने ९ ऑगस्टपासून रास्ता रोको, बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा निर्णय तालुका निर्मिती कृती समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

किल्लारी तालुका व्हावा, यासाठी परिसरातील ५२ गावातील ग्रामपंचायतीने लेखी संमतीपत्र दिले आहे. किल्लारी हे ३० हजार लोकसंख्येचे गाव असून, याठिकाणी मोठी बाजारपेठ, बाजार समिती, पोलीस ठाणे, महाविद्यालये, आठ शाळा, आयटीआय, ग्रामीण रुग्णालय असून, दरराेज ५० गावांचा संपर्क किल्लारी गावासोबत असतो. मागील ३० वर्षांपासून मागणी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनापासून रास्ता रोको, बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

शासनाकडून जाेपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला. बैठकीस उस्मानाबाद जनता बँकेचे संचालक निवृत्ती भोसले, महादेव पाटील, भाजपाचे प्रकाश पाटील, माजी उपसभापती किशोर जाधव, चेअरमन किरण बाबळसुरे, माजी सरपंच विश्वास काळे, सरपंच युवराज गायकवाड, माजी जि.प. सदस्य दिलीप लोहार, अरुण अत्तार, रिपाईचे हरीश डावरे, देविदास पवार, उपसरपंच बाबुराव बिराजदार, सतीष भोसले, रमेश हेळंबे, भुकंपग्रस्त कृती समितीचे अमर बिराजदार, डॉ. नोगजा, दिपक पाटील, विजय भोसले, डॉ. राजेश गुजिटे, पप्पु भोसले, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष शरद भोसले, प्रकाश मिरगे, किशोर भोसले, सचिन माने, विनोद बाबळसुरे, अशोक गावकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूरState Governmentराज्य सरकार