शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
3
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
4
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
5
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
6
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
7
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
8
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
9
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
10
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
11
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
12
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
13
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
14
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
15
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
17
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
18
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
19
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
20
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम

आग्रीम खात्यावर जमा होत नसल्याने शेतकरी हतबल! पीकविमा कंपनीची आता केंद्राकडे धाव

By हरी मोकाशे | Published: January 05, 2024 5:44 PM

नुकसानग्रस्त शेतकरी सातत्याने बँकेत चौकशी करीत आहेत.

लातूर : ४३ महसूल मंडळातील सोयाबीन पीकविमाधारकांना तात्काळ २५ टक्के आग्रीम देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिवाळीपूर्वी दिले होते. मात्र, पीकविमा कंपनीने बहाणे करीत ३२ मंडळांना देण्यास सुरुवात केली. पावणेदाेन महिने उलटले तरी अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर २२ कोटी जमा झाले नाहीत. बँकेत वारंवार चौकशी करुन शेतकरी हतबल झाले आहेत.

गत खरीपात जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांतील सोयाबीन पीकविमाधारकांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश दिले. दरम्यान, पीकविमा कंपनीने विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. तेव्हा विभागीय आयुक्तांसमोर कंपनीने ४३ मंडळांना आग्रीम देण्यास तयार असल्याचे सांगितले. उर्वरित १७ मंडळांसाठी पुनर्मूल्यांकन करुन सुधारित निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली. वास्तवात, कंपनीने ३२ मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आग्रीम जमा करण्यास सुरुवात केली.

आतापर्यंत १८३ कोटींचे वितरण...पीकविमा कंपनीने ३२ मंडळातील २ लाख १९ हजार शेतकऱ्यांसाठी २०५ कोटी ८८ लाख ६६ हजार ६८१ रुपये मंजूर केले. पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत १८३ कोटी ७४ लाख २६ हजार १९७ रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. अद्यापही २२ कोटी १४ लाख ४० हजार ४८४ रुपये थकित राहिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी सातत्याने बँकेत चौकशी करीत आहेत. मात्र, पीकविमा जमा झाले नसल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे शेतकरी हतबल झाले आहेत.

चाकूर तालुक्याची सर्वाधिक थकित रक्कम...तालुका - मंजूर रक्कम - थकित रक्कमऔसा - ४८ कोटी १२ लाख - ४ कोटी ९ लाखचाकूर - ३८ कोटी ७४ लाख - ७ कोटी २७ लाखजळकोट - ६ कोटी ८७ लाख - ३० लाख ३१ हजारलातूर - ५३ कोटी ७३ लाख - १ कोटी ९९ लाखनिलंगा - ३७ कोटी १ लाख - ३ कोटी ७६ लाखरेणापूर - ६ कोटी ८४ लाख - १ कोटी ९५ लाखशिरुर अनं. - ६ कोटी ७२ लाख - २ कोटी ४४ लाखउदगीर - ७ कोटी ८२ लाख - ३२ लाख १९ हजारएकूण - २०५ कोटी ८८ लाख - २२ कोटी १४ लाख

२८ महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित...विभागीय आयुक्तांसमोरील बैठकीत पीकविमा कंपनीने ४३ मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आग्रीम देण्याचे मान्य केले होते. मात्र, ऐनवेळी केवळ ३२ मंडळातील शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्यास सुरुवात केली. मान्य केलेल्यापैकी ११ आणि उर्वरित १७ अशा एकूण २८ मंडळातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे.

कंपनीची केंद्राकडे याचिका...पीकविमा कंपनीने राज्य शासनाकडे धाव घेतली होती. मात्र, ती शासनाने फेटाळली. दरम्यान, कंपनीने आता केंद्र सरकारकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आग्रीमचा पेच आणखीन वाढला असल्याचे दिसून येत आहे.

लवकरच वाटप हाेणार...३२ महसूल मंडळातील काही शेतकरी आग्रीमपासून वंचित आहेत. कंपनीस सूचना करण्यात आल्या आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.- शिवसांब लाडके, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :laturलातूरCrop Insuranceपीक विमा