शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

खरिपाच्या पीक विम्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांची चेष्टा

By आशपाक पठाण | Published: June 15, 2024 6:12 PM

हजारोंना प्रतिक्षा; गावोगावी चार दोन शेतकऱ्यांना आली रक्कम

लातूर : जिल्ह्यात गतर्षी खरीप हंगामात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नात मोठी घट झाली. सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात असताना पावसाने उघडील दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी फुलांची गळती झाली. याचा फटका जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना बसला. पीक विमा कंपनीकडून काही शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्यात आला. आता उर्वरित रक्कम गावोगावी मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आली असून इतर शेतकरी मात्र आपल्या माेबाईलवर कधी मेसेज पडणार याकडे लक्ष लावून बसले आहेत.

खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिक विमा भरला होता. त्यावेळी सोयाबीनचे पीक ऐन फुलोऱ्यामध्ये असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. राशी केल्यानंतर अनेकांच्या पदरात उत्पादन खर्चही पडला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. पावसाने ओढ दिल्याने पिकांचे नुकसान झाल्याची पाहणी वेळोवेळी विमा कंपनीकडून करण्यात आली होती. शेवटी पीक कापणी प्रयोग सुद्धा केले. जिल्हाधिकारी स्वतः हजर राहून पीक कापणी प्रत्यक्ष करून घेतले. तो अहवाल कृषी खाते महसूल खाते व संबंधित पीक विमा कंपनी व गावकरी यांच्या समक्ष आणेवारीसाठी सोयाबीनचे प्रात्यक्षिक केले. त्यात ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आली आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भामध्ये पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा सर्व शेतकऱ्यांना दिलेला आहे. आता मे महिन्याच्या २७ तारखेला काही गावांमध्ये चार-पाच जास्तीत जास्त दहा किंवा एखाद्या गावामध्ये दोन-तीन अशा शेतकऱ्यांना फक्त विमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केलेली आहे उर्वरित शेतकरी एकमेकांना विचारणा करीत आहेत.

विमा कंपनीचे भरपाईचे नेमके निकष काय...

पिक विमा वाटपासाठी विमा कंपनीचे कोणते निकष आहेत. दोन सख्खे भाऊ असून बंधाऱ्याच्या बाजूच्या शेतकऱ्याला विमा आला. एका भावाला विमा आला अन् एक भाऊ पंधरा दिवसांपासून नुसतीच वाट पाहतोय. मोबाईलवर मेसेज आला की पिकविम्याचाच असावा असा समज करून पाहत आहे. असे प्रकार गावोगावी घडत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम न आल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक...

शेतकऱ्यांना तत्काळ पिक विमा वाटप करावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित रक्कम जमा करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अरूणदादा कुलकर्णी, माजी अध्यक्ष राजेंद्र माेरे, अशोक दहिफळे, हिराचंद जैन, नवनाथ शिंदे, गोरोबा मोदी, नारायण भिसे, अण्णासाहेब भिसे, जयराम भिसे, बाळासाहेब वायाळ, महेश वायाळ, व्यंकट निलंगे, राजीव कसबे, रंगनाथ पुजारी आदींनी केली आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी