शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके; मराठी-उर्दू माध्यमांचा समावेश

By संदीप शिंदे | Updated: June 7, 2024 18:30 IST

शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर पुस्तके वाटप

संदीप शिंदे, लातूर: समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. येत्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील १० पंचायत समिती स्तरावरून मिळालेल्या मागणीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाकडे मागणी नोंदवली होती. आता पुस्तके तालुकास्तरावर दाखल झाली असून, शाळांकडे पोहोच केली जात आहेत.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद, शासकीय व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची २ लाख ६७ हजार ७७२ असून, त्यांच्यासाठी तेवढ्या पाठ्यपुस्तक संचाची मागणी नोंदवण्यात आली होती. २०२४ - २५ या शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. ही पुस्तके एकात्मिक स्वरुपाची असून, मराठी, उर्दू माध्यमांचा यात समावेश आहे. पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यानंतर तालुकास्तरावर पोहोचवली आहेत. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, शाळेतील गळतीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांत त्याचा सकारात्मक बदल दिसून येईल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. महिनाभरापूर्वी बालभारतीकडून पुस्तके दहाही तालुक्यातील पंचायत समित्यांकडे रवाना करण्यात आली होती. ही पुस्तके पंचायत समितीमधून शाळांमध्ये पोहोच करण्यात येत आहेत. शनिवार, १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून, पहिल्याच दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत.

मराठी माध्यमाचे २ लाख ४३ हजार विद्यार्थी

पहिलीसाठी मराठी माध्यमाचे २७,८१४, दुसरीचे २७,८१४, तिसरी २७,४३९, चौथी ३१,०६१, पाचवी २७,५८२, सहावी ३१,८९६, सातवी ३४,२६६, तर आठवीच्या ३५ हजार २७१ अशा एकूण २ लाख ४३ हजार १४३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने पुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.

उर्दू माध्यमाचे २४ हजार ६२९ विद्यार्थी

पहिलीसाठी उर्दू माध्यमाचे ३,२६२, दुसरीचे ३,२६२, तिसरी ३,१५९, चौथी ३,१६९, पाचवी २,८८५, सहावी ३,०७१, सातवी २,८९६, तर आठवीच्या २ हजार ९२५ अशा एकूण २४ हजार ३१२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १,२७१, उर्दू माध्यमाच्या १५१, हिंदी माध्यमाच्या दोन, इंग्लिश माध्यमाच्या २२८, अशा एकूण २,६५६ शाळा आहेत. यातील मराठी आणि उर्दू शाळेत या पुस्तकांचे वाटप होणार आहे.

शिक्षण विभागाकडून वितरणाचे नियोजन पूर्ण

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सीईओ अनमोल सागर, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. पंचायत समितीस्तरावर पुस्तके दाखल झाली असून, आता शाळांकडे पोहोच करण्यात येत आहेत. शनिवार, १५ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. नियोजन पूर्ण झाल्याचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले.

मराठी, उर्दु माध्यमाचे तालुकानिहाय पुस्तके वितरण

  • अहमदपूर - २८७६२
  • औसा - २८६१५
  • लातूर - ८३४९७
  • निलंगा - ३२३०२
  • उदगीर - ४०७१९
  • चाकूर - १६०४१
  • रेणापूर - ११५७०
  • देवणी - ८२९९
  • जळकोट - ८९६०
  • शिरुर अनं. - ७००४
  • -------------------
  • एकूण - २६७७७२
टॅग्स :laturलातूर