शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

लातूरात पहिला बुधवार तक्रार निवारण दिन; थेट झेडपी सीईओंच जाणून घेणार नागरिकांच्या तक्रारी

By हरी मोकाशे | Updated: February 7, 2024 16:44 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेत दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन राबविण्यात येणार आहे.

लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गतच्या अडचणी, तक्रारींचा तात्काळ निपटारा करुन समस्याग्रस्तांचे विनाविलंब समाधान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन सुरु केला आहे. या दिवशी ग्रामीण भागातील नागरिकांना थेट सीईओंसमोर तक्रारी मांडता येणार आहेत.

जिल्हा परिषदेस मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. जिल्हा परिषदेअंतर्गत सामान्य प्रशासन, अर्थ, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, पंचायत, बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, लघुपाटबंधारे व पाणीपुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असे विविध विभाग आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण ७८६ गावे आहेत. गाव पातळीवर अथवा पंचायत समिती स्तरावर अडीअडचणींची न सुटल्यास सदरील नागरिक जिल्हा परिषदेकडे धाव घेतात. त्यामुळे विविध कामानिमित्ताने दररोज ग्रामीण भागातील नागरिकांची रेलचेल असते. तक्रारी घेऊन आलेल्यांना लवकर समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा असते.

सीईओंसह सर्व विभागप्रमुख...जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेत दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन राबविण्यात येणार आहे. या दिवशी सीईओ यांच्यासह जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभागाचे विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. हे सर्वजण नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडविण्यासाठी कार्यवाही सुरु करणार आहेत.

पहिल्या दिवशी चार तक्रार...जिल्हा परिषदेत सीईओ अनमोल सागर यांच्या समोर प्रयोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरु करण्यात आला. गेल्या महिनाभरात तक्रार दाखल केलेल्यांपैकी काही जणांना बुधवारी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी चौघजण उपस्थित होते. त्यातील एका प्रकरणासंदर्भात तात्काळ तपासणीचे आदेश सीईओंनी बांधकाम विभागास दिले.

अशा प्रकरणांवर होणार नाही सुनावणी...ग्रामीण भागातील नागरिकांनी आपली तक्रार जर मुख्यमंत्री कार्यालय, आपले सरकार, लोकशाही दिन, न्यायालयात अथवा लोकायुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली असल्यास त्या प्रकरणांवर जिल्हा परिषदेत सुनावणी होणार नाही.

ग्रामीण जनतेसाठी उपयुक्त उपक्रम...सीईओ अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेतही आता दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन सुरु करण्यात येत आहे. हा उपक्रम ग्रामीण जनतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे तक्रारी, समस्यांचा जलद गतीने निपटारा होईल.- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद