शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
4
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
5
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
6
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
7
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
8
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
9
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
10
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
11
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
12
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
13
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
14
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
15
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
16
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
17
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
18
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
19
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
20
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी महावितरण कार्यालयास टाळे

By आशपाक पठाण | Published: August 30, 2023 7:06 PM

शेतकरी संतप्त : कमी दाबाने वीज पुरवठ्याची तक्रार

वलांडी (जि. लातूर) : गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी महावितरणकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी वलांडीच्या महावितरण कार्यालयास टाळे लावले. विद्युत पुरवठा सुरळीत केल्याशिवाय टाळे काढणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने महावितरण कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.

मागील महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतातील उभी पिके डोळ्यासमोर करपू लागली आहेत. त्यात ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते शेतकरी पाणी देवुन पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हेळंब व धनेगाव या दोन गावांना कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने शेतातील विद्युत मोटारी चालत नाहीत. शिवाय कधी तरी सुरळीत वीजपुरवठा झाला तरी काहीवेळातच पुन्हा वीज गुल होते. याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी महावितरण कंपनीला कळवूनही वीज पुरवठा सुरळीत केला नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आता आसमानी संकटाबरोरच सुलतानी संकट ओढवले आहे.

संतप्त झालेले शेतकरी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वलांडी येथील कार्यालयात जाऊन बसले. आपल्या समस्या मांडत असताना शेतकऱ्यांची चक्क कार्यालयास टाळे ठोकले. तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे, उपसरपंच सोपान शिरसे, माजी सरपंच गुणवंत सावंत, कुमार पाटील, सिध्देश्वर सावंत, महेश शिरपुरे, मनोज सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजेचे सुलतानी संकट...

पावसाने हुलकावणी दिल्याने सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. डोळ्यासमोर जोमात आलेले सोयाबीनेच करपत आहे. त्यातच ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, असे शेतकरी पिके जगविण्याची धडपड करीत आहेत. मात्र, महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी दाबाने होत असलेला विद्युत पुरवठा हे सुलतानी संकट आहे, असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला.