शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

मराठवाडा, विदर्भाच्या विकासात निलंगेकराचं मोठे योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 05:41 IST

श्रद्धांजली । शिवाजीराव पाटील निलंगेकर

लातूर : मुख्यमंत्री तसेच मंत्री असताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ते स्वातंत्र्यसेनानी होते. मराठवाडा, विदर्भ विकासाची त्यांनी पायाभरणी केली. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ४२ कलमी, विदर्भासाठी ३३ कलमी तर कोकण विकासासाठी ४० कलमी कार्यक्रम राबविला. रोजगार हमीवरच्या मजुरांना मजुरीशिवाय दररोज धान्य देण्याची क्रांतिकारी योजना त्यांनी राबविली. तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी सुरू करण्याचा निर्णय डॉ. निलंगेकर यांचाच होता. लोकन्यायालय, प्रशासकीय न्यायाधिकरण, मागासवर्गीय वस्त्यांचे विद्युतीकरण यासह राज्यातील १० जिल्हा व तालुका न्यायालयांच्या इमारतीचे काम त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाले. शिक्षणसंस्थांचे जाळे निर्माण केले. गुणवत्तेवर नियुक्त्या आणि शासनमान्य शुल्कावरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा पायंडा निर्माण केला.

लातूर येथील जवाहर सहकारी सूतगिरणीचे ते संस्थापक होते. लातूर व जालना जिल्ह्याच्या निर्मितीत, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ उभारणीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे राहिले. औरंगाबाद महापालिका, नव्या विधानसभेची इमारत हे त्यांच्याच निर्णयाचे फलित आहे. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रात दीर्घकाळ परिणाम करणारे काम केले. मोठ्या व लघु प्रकल्पांची उभारणी केली. लोअर तेरणा, उजनी, सिंदफणा, कुकडी, कृष्णा, मांजरा, डिग्वे, अप्परवर्धा, धनेगाव, मदनसुरीसह अनेक लघु प्रकल्प साकारले.एक हृद्य आठवणमाजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे लोकमत परिवाराशी खूप जिव्हाळ्याचे नाते होते. ते मुख्यमंत्री असताना एका कार्यक्रमप्रसंगी टिपलेल्या छायाचित्रात त्यांच्या समवेत तत्कालीन मंत्री स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डाराजकीयकारकीर्दमाजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी १९६२ पासून सातत्याने निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. नऊवेळा विधानसभेवर तर एकदा विधान परिषदेवर निवडून गेले.असे एकूण ते ४१ वर्षे विधिमंडळात राहिले. ३ जून १९८५ ते ७ मार्च १९८६ या कालावधीत ते राज्याचे मुख्यमंत्री तर १९९२ मध्ये ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. राज्याच्या मंत्रिमंडळात प्रदीर्घकाळ अनेक खात्यांचा पदभार सांभाळला. प्रामुख्याने गृह, महसूल, आरोग्य, जलसिंचन, सार्वजनिक बांधकाम यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचे काम पाहताना जनहिताचे निर्णय घेतले.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक लोकाभिमुख नेता गमावला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी, गरीब व कष्टकऱ्यांसाठी डॉ. निलंगेकर यांनी पथदर्शी काम केले.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

स्वातंत्र्य लढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणाºया नेतृत्वात ज्येष्ठ नेते डॉ. निलंगेकर यांचा समावेश होता. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी नेहमी आग्रही असणाºया डॉ. शिवाजीराव पाटील यांनी तितक्याच तडफेने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :laturलातूरShivajirao Patil Nilangekarशिवाजीराव पाटील निलंगेकर